फोटो सौजन्य - सोशल मिडिया
उत्तर रेल्वेने या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. आज ७ मार्च २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजता ही विशेष ट्रेन दिल्लीहून रवाना होणार आहे. १९ डब्यांच्या या ट्रेनमध्ये सेकंड एसी आणि थर्ड एसी कोचची व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे चाहत्यांना परवडणाऱ्या दरात आणि सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
रेल्वेची ही विशेष सेवा केवळ दिल्लीपुरती मर्यादित नसून, पश्चिम रेल्वेनेही मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रविवारच्या अंतिम सामन्यासाठी देशभरातून क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने ही ‘तुफानी खेळी’ खेळली आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडवर सात धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आपले स्थान निश्चित केले आहे. या दोन दिग्गज संघांमधील थरार पाहण्यासाठी १,३२,००० प्रेक्षक क्षमता असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरण्याची चिन्हे आहेत.
क्रिकेट प्रेमियों के लिए भारतीय रेल की खास सौगात! बढ़े फ्लाइट टिकट और टिकटों की अनुपलब्धता को देखते हुए रेलवे द्वारा यात्रियों की सहूलियत के लिए नई दिल्ली से साबरमती के लिए आज दिनांक 7 मार्च 2026, रात 11:45 बजे विशेष ट्रेन का ऐलान। 3rd AC और 2nd AC के कोच वाली इस 19 कोच की… pic.twitter.com/LQuMPByqln — Northern Railway (@RailwayNorthern) March 7, 2026
मैदानातील क्रिकेटच्या रोमांचसोबतच चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आयसीसीने (ICC) खास तयारी केली आहे. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी एक भव्य समारोप समारंभ पार पडणार आहे. यामध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी मार्टिन, ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह आपल्या आवाजाने स्टेडियम गाजवणार आहेत. नाणेफेकीपूर्वी होणारा हा म्युझिकल शो प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल. यामुळे क्रिकेट आणि बॉलिवूडचा एक जबरदस्त मिलाफ अहमदाबादमध्ये पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे, अहमदाबादमध्ये वर्ल्ड कपची फायनल खेळण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून कोट्यवधी भारतीयांची मने तोडली होती. त्यामुळे यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्या पराभवाचा बदला घेण्याच्या आणि विजेतेपद पटकावण्याच्या जिद्दीने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. रेल्वेच्या या विशेष सोयीमुळे हजारो चाहत्यांना स्टेडियमवर पोहोचून आपल्या संघाला पाठिंबा देणे आता सोपे झाले आहे.






