(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हा एक सोपा बजेटिंग फॉर्म्युला आहे. जो तुमच्या हातात येणाऱ्या पगाराचे तीन भागांमध्ये विभाजन करतो:
१. ५०% गरजांसाठी – जसे की घरभाडे, किराणा सामान, वीज बिल, ईएमआय
२. ३०% आवडींसाठी – जसे की प्रवास, खरेदी, ओटीटी, बाहेर जेवणे
३. २०% बचतीसाठी – गुंतवणूक, एसआयपी, आपत्कालीन निधी
या नियमाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची लवचिकता म्हणजेच Flexiblity.
तुमचा पगार ₹25,000 असला तरी, तुम्ही तुमचा खर्च आणि बचत ठरवण्यासाठी या बजेटिंग सूत्राचा वापर करू शकता.
₹2.5 लाख कमावणारी व्यक्तीसुद्धा प्रमाणानुसार बजेटिंग करून अतिरिक्त खर्च टाळू शकते.
याचा अर्थ असा की, कमाई कमी-जास्त असणे महत्त्वाचे नाही; पैशांचे सुज्ञपणे वाटप करणे महत्त्वाचे आहे.
समजा तुमचा पगार ₹५०,००० आहे.
₹२५,००० अत्यावश्यक खर्चांसाठी.
₹१५,००० इच्छांसाठी.
₹१०,००० बचत/गुंतवणुकीसाठी.
आजकाल बहुतेक लोक ‘कमाव आणि खर्च कर’ या चक्रात अडकतात.
हा नियम आर्थिक शिस्त शिकवतो, बचतीची सवय लावतो, भविष्यातील सुरक्षितता सुनिश्चित करतो. उदा., निवृत्ती, आपत्कालीन परिस्थिती यांसारख्या गोष्टींसाठी कामी येतो.
आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या मते, हा नियम केवळ बजेट बनवण्याचा एक मार्ग नाही, तर जीवनशैलीवर नियंत्रण ठेवण्याचे एक साधन आहे. तुमचे पैसे कुठे खर्च होत आहेत आणि कुठे कपात करणे आवश्यक आहे, हे समजण्यास तो तुम्हाला मदत करतो. ५०-२०-३० नियम हे एक सोपे सूत्र आहे, जे सर्व उत्पन्न गटांतील लोकांना उत्तम आर्थिक नियोजन आणि अधिक भक्कम भविष्याकडे वाटचाल करण्यास मदत करते.






