11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश (फोटो- istockphoto)
पुणे : राज्यातील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी शून्य फेरीत कोटाअंतर्गत तब्बल ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९ हजार २६३ कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, एकूण प्रवेश क्षमता २० लाख ३० हजार ३३३ इतकी आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. यापैकी कॅप फेरीसाठी १६ लाख १० हजार २९३ तर कोटा प्रवेशासाठी ४ लाख ५९ हजार ६५३ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९ लाख ५४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शून्य फेरीअंतर्गत इन-हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश निश्चित करण्यासाठी १८ व १९ मेदरम्यान विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली होती.
शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, शून्य फेरीत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण मानण्यात येणार असून, त्यांची नावे पुढील प्रवेश फेऱ्यांमधून वगळण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
पुण्यात सर्वाधिक प्रवेश
या कालावधीत राज्यभरातील ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. विभागनिहाय पाहता पुणे विभागात सर्वाधिक ८ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यामध्ये ५ हजार ८२६ इन-हाऊस, १ हजार ११५ व्यवस्थापन व १ हजार ५८५ अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशांचा समावेश आहे.
नोकरदारांसाठी ऑनलाईन कोर्सेस बेस्ट
आजच्या काळात चांगल्या नोकरीसोबतच उत्तम् शिक्षण घेणेही अत्यंत गरजेचे आहे, अशा परिस्थितीत, ‘ऑनलाईन एज्युकेशन’ (ऑनलाईन शिक्षण) वेगाने लोकांची पसंती बनत आहे. आता विद्यार्थी आणि नोकरदारवर्ग घरबसल्या ऑनलाईन केर्सेसच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.






