अखेर कोपरखैरणेत CBSE शाळेला मिळणार शिक्षक (फोटो सौजन्य - iStock)
शिक्षण व्हिजन धोरणानुसार नवी मुंबईमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोपरखैरणे, नेरूळ सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोपरखैरणेतील महापालिकेच्या शाळा क्रमांक ९४ साठी शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळासोबत करार करण्याच्या प्रस्तावावरून स्थायी समितीत वादंग निर्माण झाला होता. मात्र, चर्चेअंती या प्रस्तावाला सुधारणेसह मंजुरी देत सुमारे ३४ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपयांचा १० वर्षांच्या करार पद्धतीने शिक्षक देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
स्व-मूल्यमापनासाठी शाळांना देण्यात आली मुदतवाढ; SQAAF अंतर्गत स्व-मूल्यमापन करणे बंधनकारक
“या ठरावाबाबत इत्यंभूत माहिती या ठरवाबाबत इत्यंभूत माहिती निर्माण होत आहे. सचिवांनी ठराव परिपूर्ण द्यावा. या शाळेत किती शिक्षक घेतले जाणार? दहा वर्षांचा करार का केला आहे? पालिकेने प्रत्येक वर्षी करार करावा” – मंदाकिनी म्हात्रे नगरसेविका, गोठीवली गाव शिवसेना
“हा विषय केवळ खर्च मंजूरीचा नसून महापालिकेच्या शैक्षणिक धोरणाचा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, शिक्षक व्यवस्थापनाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. त्यामुळे अशा प्रस्तावाकडे केवळ कंत्राट, निविदा किंवा खर्चाच्या चौकटीतून पाहू नये. जवळपास ३५ कोटी कोणत्या आधारावर ठरविण्यात आले आहेत. सुरुवातीच्या अंदाजपत्रकातच भविष्य निर्वाह निधीचा समावेश का करण्यात आला नव्हता? या दीर्घकालीन करारा ऐवजी किमान २ किवा ३ वर्षांचा प्रायोगिक कालावधी ठेवणे गरजेचे होते. पालिकेने स्वतःच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देणे गरजेचे होते” – सरोज पाटील नगरसेविका, शिवसेना, अग्रोळी गाव “आपण हा विषय आणला तो सर्व विचार करूनच राहणे गरजेचे आहे. शिक्षक टिकणे महत्वाचे आहे. म्हणून दहा वर्षांचा करार संस्थेशी केला आहे. तसेच पालिकेचा प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कार्यालयात राहणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत” – अशोक पाटील, सभापती, स्थायी समिती, नवी मुंबई पालिका “कोपरखैरणेची शाळा आकांक्षा फाउंडेशनला दिली होती. त्यावेळी तत्कालीन स्थायी समितीने सिवुडची शाळा पालिकेने स्वतः चालवावी अशा सूचना दिल्या होत्या मात्र पालिकेने दिलेल्या शिक्षकांबद्दल पालिकांना तक्रारी होत्या. सीबीएसईचा दर्जा चांगला राखण्यासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची भरती संस्थेद्वारे केली जात आहे” – संघरत्ना खिल्लारे, शिक्षण उपआयुक्त, नवी मुंबई पालिका “नवी मुंबई पालिका शिक्षण विभाग स्वागतार्ह पाऊल टाकत आहे. सीबीएसई शाळांचा दर्जा टिकवणे गरजेचे असून, त्यानुसार शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या बाबतीत पालकांची तक्रार येता कामा नये” – सुधाकर सोनवणे, स्थायी समिती सदस्य “सारसोळे येथे शाळा सुरू केली आहे. आमचा लोकप्रतिनिधी तिथे बाहेर बसला होता. त्या शाळेचा विचार व्हायला हवा. तिथे शिक्षक उपलब्ध व्हायला हवेत. मराठी माध्यमाच्या शाळांची सीबीएसई प्रमाणे काळजी घ्यावी. ताडचेह शिक्षण विभागाने यापुढे परिपूर्ण प्रस्ताव आणावा, चालढकल पण करू नये प्रशासकीय अधिकारी नेमताना शिपायाचा क्लार्क झालेला अॅडमिनिस्ट्रेटर बसवू नका” – जयवंत सुतार, माजी महापौर, स्थायी समिती सदस्य






