फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Mughal Women : मुघलांचे नाव येताच लोकांच्या डोळ्यांसमोर शाही महल बादशहा आणि तेथील हरमचे चित्र समोर उभे राहते, मुघल हरम म्हणजे केवळ राण्या आणि बेगमांच्या राहण्याची जागा नव्हती तर तेथूनच अनेकदा संपूर्ण सल्तनतचे राजकारण ठरत असेह. मात्र, हे खूपच कमी लोकांना माहित आहे. मुघल काळात काही महिलांच्या नावावर नाणी पडली, तर काहीनी पडद्याआड राहूनही संपूर्ण साम्राज्याची दिशा बदलून टाकली. चला तर मग जाणून घेऊया मुघल सल्तनतच्या महत्तपूर्ण दोन महिलांची, ज्यांच्या इशाऱ्यावर संपूर्ण साम्राज्य चालायचे.
महाम अंगा या अकबर बादशहाच्या दूध पाजणारी आई होत्या आणि अकबरच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. जेव्हा अकबर कमी वयात गादिवर बसला, तेव्हा त्याला अनुभवी लोकांच्या आधाराची गरज होती. त्याच काळात अधम खान यांचे नावही सत्ता संघर्षात समोर येते. इतिहासकारांच्या सांगण्यानुसार, महाम अंगा यांनी पडद्याआड राहून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जरी नंतरच्या काळात अकबरने सत्ता स्वत:च्या हातात घेतली आणि अशा निर्णयांवर मर्यांदा आणले तरीही, सुरुवातीच्या काळात महाम अंगा यांची ताकद एखाद्या मोठ्या मंत्र्यापेक्षा कमी नव्हती.
मुघल इतिहासातील सर्वात चर्चित, प्रभावशाली आणि शक्तिशाली महिलांमध्ये नूरजहाँचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जहांगीरच्या राजवटीत त्यांचा प्रभाव इतका वाढला होता की, त्यांच्या नावाने राजेशाही आदेश निघू लागले होते.
इतिहासात असाही उल्लेख अढळतो की, त्यांच्या नावाने नाणीही पाडली गेली होती. नूरजहाँ यांनी दरबारातील वेगवेगळ्या गटांमध्ये समतोल राखण्यात आणि सत्ता मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या केवळ जहांगीर बादशहाची बेगम नव्हत्या, तर एक कुशल राजकीय रणनीतीकारही होत्या. त्यांनी नातेसंबंध आणि राजकीय आघाड्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन यंत्रणेवर प्रभावही पाडला होता, त्यांची ताकद पाहून अनेक परदेशी प्रवासीही थक्क होत आसत.






