काय नेमकं घडलं?
या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गणेशची कोळी असे आईच. गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यांनतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. मार्च २०२६ मध्ये त्याचा विवाह बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्याशी निश्चित झाला आणि 13 मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहे.
मात्र लग्नानंतर तिचे वागणे बदलले. लग्नानंतर कुलदैवताचे दर्शनाला गेले असता दिपालीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत होती. त्यांनतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र दिपालीचे वागणे बदलले होते. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली.
गणेश हा २४ मे रोजी दिपालीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. 25 मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, दिपालीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने दिपाली राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली.
दिपालीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलला असा आरोप गणेशाची आई सुनंदा दत्तू कोळी (रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) यांनी केली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. या घटनेने गणेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Ans: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी होते.
Ans: गणेश कोळी हा तलाठी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होता.
Ans: मृत तरुणाची पत्नी दिपाली हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






