घोर कलियुग! 'मला न्याय द्या तोपर्यंत...' न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली
सहारनपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर रवी कुमार या दलित तरुणाने न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहे. रवी कुमारचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले आणि त्याला घटस्फोट न देता पळून गेली, तसेच त्या दोघांना एक मूल आहे. यानंतरही पोलिसांनी तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही.
रवी कुमारने सांगितले की, त्याने २ जुलै २०१८ रोजी शोशनशी लग्न केले. जिची ओळख राधिका म्हणून आगे. लग्नानंतर, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह घरातून सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. त्यानंतर रवि कुमारवर पत्नी आणि प्रियकराने खोटे आरोप करत हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यातून रवि कुमारला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
पीडिताचा आरोप आहे की ऑगस्ट २०२३ मध्ये त्याच्या पत्नीने दीपक नावाच्या पुरुषाशी अवैध संबंध ठेवले आणि घटस्फोट न घेता त्याच्याशी लग्न केले. त्यांना एक मूल आहे. हे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, परंतु पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
रवी कुमार यांनी स्थानिक पोलिसांवर त्यांच्या विरोधकांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की चोरीला गेलेला माल आजपर्यंत परत मिळवण्यात आला नाही आणि तपासादरम्यान खोटे जबाब नोंदवण्यात आले. कलम १२०-ब देखील रद्द करण्यात आले.
रवीने पोलीस स्टेशन, एसएसपी, डीआयजी, जिल्हा दंडाधिकारी आणि अगदी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारी दाखल केल्या, परंतु सर्वत्र निराशा झाली. आई-वडिलांचे छात्र हरवलेल्या आणि स्वत: गंभीर आजाराला झुंज देणार रवीने न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला. शंभर दिवस बकरीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगलेलं चांगलं!” असं रवीने म्हटलं आहे.






