अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर...
नागपूर : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून अविवाहित तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन महिलांना अटक केली. टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या टोळीने त लग्नाचे आमिष दाखवत तरुणाकडून रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने उकळले.
याप्रकरणी तहसील पोलिसांनी राणी ऊर्फ कोमल पांडे (३१, रा. जरीपटका), नम्रता मालवीय (२१, रा. यशोधरानगर), शहनाज ऊर्फ गुड्डी शाहिद मो. अंसारी, (३६, रा. जरीपटका) आणि उज्ज्वला सोनटक्के (४१, रा. कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. टोळीतील इतर चार साथीदारांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या भावनगर येथील आकाश पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात होता. त्याचदरम्यान मित्रामार्फत त्याची नागपुरातील काही व्यक्तींशी ओळख झाली. त्यांनी लग्न जुळवून देण्याचे आश्वासन दिले. मुख्य आरोपी राणी ऊर्फ कोमल पांडे हिने आकाशची मेयो रुग्णालयाजवळ नम्रता मालवीय हिच्याशी ओळख करून दिली.
वधूच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आकाशला कोराडी परिसरातील घरात नेले. तेथे त्याला त्याच दिवशी विवाह लावून देता येईल, असे सांगितले. विवाहाच्या विधींसाठी रोख आणि दागिन्यांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून आकाशने एटीएममधून ७० हजार रुपये काढले आणि सोन्या-चांदीचे दागिने संबंधित महिलेकडे दिले. त्यानंतर विवाहासाठी सर्वजण बर्डी परिसरात गेले. मात्र, तेथे अचानक नम्रताचा पती असल्याचा दावा करणारा व्यक्ती आला आणि आकाशला जाब विचारू लागला. आपली फसवणूक झाल्याचे आकाशच्या लक्षात आले. त्याने तातडीने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपींना 5 दिवसांची कोठडी
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रथम नम्रता मालवीय हिला अटक केली. त्यानंतर मुख्य आरोपी राणी ऊर्फ कोमल पांडे हिला पाचपावली या आरोपींचा यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीतून बेड्या
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा ते आठ टक्के निश्चित परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकाची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या फरार संचालकाला ‘फिजी’ देशातून भारतात आणण्यात आले. राहुल शामराव काळोखे असे या आरोपीचे नाव आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी केल्यानंतर त्याचा तो फिजीमध्ये असल्याचे समजले होते. त्यानंतर भारत सरकारच्या विविध यंत्रणांच्या समन्वयातून त्याला भारतात आणण्यात आले.






