गोरेगावच्या रेल्वे स्थानकात दिसला…
तो घरातून बाहेर पडल्यावर गोरेगाव रेल्वे स्थानकात आला. फेस रिकॉग्निशन सिस्टममध्ये तो कैद झाला. त्या नंतर तो मरीन लाईन्स मध्ये आला. चर्चेगेटला आल्यावर त्याला दोघे जण हेरतात आणि त्याला फसवून चर्चगेट मधून थेट गुजरातच्या दिशेने घेवून जातात. पोलिसांनी अतिशय टेक्निकल पद्धतीने त्यांचे मोबाईल नंबर मिळवले आणि त्या नंतर त्यांचे लोकेशन शोधून काढले. जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ते केटरिंग व्यवसायाला मूल पुरवतात ही माहिती समोर अली. चक्क या मुलाचा यांनी सौदा केला आणि त्याला राजस्थानला घेवून गेले. पोलिसांनी थेट राजस्थान मध्ये धाड टाकली आणि या मुलाला ताब्यात घेवून मुंबई मध्ये दाखल झाले. तब्बल तीन महिन्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा मिळाला .त्याला राजस्थान मध्ये सिरोही मध्ये नेण्यात आल आणि एका केटरिंग कामाला जुंपण्यात आल होत.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा आदेश!
मुलगा गायब झाल्यानंतर पोलीस ठाण्यात अपहरण तक्रार देण्यात आली. दोन महिने उलटून गेले तरी मात्र मुलाचा शोध लागत नव्हता. मुलाच्या आठवणीत आई वडील व्याकुळ होवून गेले होते. त्यांनी मुंबई चे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्या नंतर त्यांनी गुन्हे शाखेला हे प्रकरण वर्ग केल आणि तपास करायला सांगितल. त्याला अखेर तीन महिन्यानंतर मुंबई पोलिसांनी सुखरुप घरी दाखल केल. मुलाला पाहताच आई वडील भावुक झाले होते.
Porsche Car Accident प्रकरणातील विशाल अग्रवालला दिलासा? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
Ans: मोबाईलवर रील्स पाहण्यावरून वडिलांनी ओरडल्यामुळे तो रागात घर सोडून बाहेर पडला.
Ans: अपहरणकर्त्यांनी त्याला गुजरातमार्गे Sirohi येथे नेऊन केटरिंग कामाला लावले होते.
Ans: Mumbai Police यांनी फेस रिकग्निशन आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने तपास करून राजस्थानमध्ये छापा टाकत मुलाची सुटका केली.






