फोटो सौजन्य - Social Media
मौल्यवान जागेवर असलेल्या या घरावर डोळा ठेवून यशवंत ते मिळवण्यासाठी सातत्याने नवनवे डाव आखत आहे. पैशांची लालच, दबाव, धमक्या आणि जबरदस्ती अशा अनेक मार्गांचा वापर करूनही गौरी झुकत नसल्याचं पाहून तो आणखी टोकाचं पाऊल उचलतो. आपल्या स्वार्थासाठी तो गौरीची मुलगी यमुना हिचं अपहरण करतो आणि घराच्या बदल्यात मुलीचा जीव सुरक्षित ठेवण्याची अट तिच्यासमोर ठेवतो.
एकीकडे गंभीर आजाराशी झुंज देणारी गौरी आणि दुसरीकडे मुलीच्या सुरक्षिततेची चिंता यामुळे ती पूर्णपणे हतबल होते. अशा कठीण प्रसंगी ती स्वामी समर्थांच्या चरणी धाव घेते आणि आपल्या घराचं तसेच मुलीच्या भविष्याचं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करते. तिची श्रद्धा आणि स्वामींवरील अढळ विश्वास या संकटातून तिला बाहेर काढतील का, याची उत्सुकता आता वाढली आहे.
यशवंतचा अहंकार आणि कपट यांना स्वामी कसा धडा शिकवणार? गौरीचं घर आणि यमुना दोघांनाही सुरक्षित ठेवण्यात स्वामींचा आशीर्वाद कसा कामी येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांत उलगडणार आहेत. त्यामुळे ‘जय जय स्वामी समर्थ’मधील पुढील घडामोडी प्रेक्षकांसाठी अधिकच रंजक ठरणार आहेत.






