फोटो सौजन्य - Social Media
कसा आहे ट्रेलर?
सिनेमात नागराज मंजुळे यांनी वरिष्ठ छायाचित्रकार चंदू पानसरे यांची भूमिका साकारली आहे, तर अमेय वाघने छायाचित्रकार सिद्धार्थ देशमुखची भूमिका साकारली आहे. कामादरम्यान चंदू पानसरे यांच्यासमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी आणि त्या अनुभवांतून सिद्धार्थचा घडत जाणारा प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चंदू पानसरे यांना एक प्रश्न विचारतो, “एखाद्या अपघातस्थळी चांगला माणूस व्हावं की चांगला फोटोग्राफर?” त्यावर चंदू उत्तर देतात, “अशा वेळी आपण आपलं काम करावं आणि एक चांगला फोटोग्राफर व्हावं.”
हा दमदार संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे. त्यामुळे अनेक चाहते आता 10 जुलैची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Ramayana Movie: ‘रामायण’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपणार? ४००० कोटींच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट
नागराज नाही, ‘या’ दिग्दर्शकाचा आहे सिनेमा!
या सिनेमात नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत असले, तरी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विक्रम पटवर्धन यांनी केले आहे. ‘आटपाट’ आणि नागराज मंजुळे यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.






