फोटो सौजन्य - Social Media
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर राखीला Media ने महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी सक्तीची करण्यात येणार असल्यावर प्रश्न केला. त्यावर राखीने स्पष्ट शब्दात उत्तर दिले की, “Up मध्ये Up ची भाषा बोलली जाते. दक्षिणेकडे दाक्षिणात्य भाषा बोलले जातात. मग महाराष्ट्रात मराठी बोलावीच लागेल.” हे ऐकून Media ने राखीला आणखीन एक सवाल केला की “असे म्हणले जाते आहे की मराठी अवगत नसणाऱ्या रिक्षाचालकांचा permit रद्द केला जाईल? यावर तुमचे मत काय?” तेव्हा राखी म्हणाली की, “महाराष्ट्र शासन दयाळू आहे, ते यावर काही तरी तोडगा नक्की काढतील.”
मुळात, राखीच्या मतेही महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राची मायबोली मराठी तर बोलावीच लागेल. राखीसह अनेक सिनेकलाकारांनी या मुद्द्यावर त्यांची मते मांडली आहेत. अभिनेता अंशुमन विचाराने परप्रांतीयांना “माज करू नका!” अशा शब्दांत सुनावले आहे. अभिनेता हेमंत ढोमे पोस्ट करत परप्रांतीय रिक्षाचालकांना म्हणाला आहे की, “आपपल्या राज्यात परत जा! तिथेच कमवा आणि तिथेच खा!”
सुप्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख सध्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीचा लालपरीचा चेहरा बनला असून, त्या व्यासपीठावर भाष्य करताना या निर्णयाचे कौतुक त्याने केले आहे. तसेच त्याने स्पष्ट शब्दात “महाराष्ट्रात मराठीच!” असे सांगितले आहे. गायकीमध्ये अव्वल शिंदेघराण्याचा वारसदार गायक उत्कर्ष शिंदेनेही त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. तो म्हणाला आहे की “मराठी शिका आणि मराठी शिकायची नसेल तर निघा!” असे ठणकावून सांगितले आहे.
1 मे रोजी या निर्णयाला राज्यभरात लागू करण्यात येणार आहे.






