संसदेच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधींचे चहा पार्टी केल्याने भाजप नेते आक्रमक झाले (फोटो - सोशल मीडिया)
देशामध्ये युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने विरोधकांनी संसदेच्या आवारामध्ये चूल मांडली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकरावर टीका करण्यात आली. तसेच हे परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे. यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विरोधकांनी केलेल्या आंदोलनामध्ये गॅस तुटवड्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. मात्र यावेळी संसदेच्या आवारात राहुल गांधींसह इतर विरोधी खासदारांनी चहा-बिस्किट खाल्ले. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार केला आहे.
Rahul Gandhi protesting against so called LPG shortage by drinking tea in Parliament Sometimes he reminds of Bollywood movie Taare zameen par 😂pic.twitter.com/qbZvSY1m2m — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) March 13, 2026
हे देखील वाचा : अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा
संसदेच्या आवारातील या चहाच्या पार्टीवरुन किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित करत टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, जर त्यांचे नेते (राहुल गांधी) सुधारले नाहीत तर इतर काँग्रेस सदस्यही सुधारणार नाहीत. आज, लोकसभा अध्यक्षांनी स्वतः वारंवार सांगितले की अविश्वास प्रस्तावावर दोन दिवसांच्या चर्चेनंतर परिस्थिती सुधारली पाहिजे. परंतु सुधारणा होण्याऐवजी, काँग्रेस सदस्य संसदीय सभेत अन्न आणि पेये घेऊन बेशिस्तपणा दाखवत आहेत. काँग्रेस नेत्यांना वाटते की ते नाट्यमय कृतींद्वारे जनतेचे लक्ष वेधू शकतात, परंतु विरोधी सदस्यांच्या अशा कृतींमुळे जनता संतप्त आहे आणि म्हणूनच ते सत्तेत येऊ शकत नाहीत.काँग्रेस पक्षात त्यांच्या नेत्याशी (राहुल गांधी) तर्क करू शकणारा कोणीही शिल्लक नाही, कारण त्यांच्या नेत्यासह सर्व काँग्रेस सदस्यांचे वर्तन बिघडले आहेविरोधी सदस्यांकडे अजूनही वेळ आहे. त्यांनी स्वतःला सुधारले पाहिजे, अन्यथा जनता त्यांना पुन्हा शिक्षा करेल, अशी टीका किरण रिजिजू यांनी केली.
हे देखील वाचा : गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय
देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेच्या आवारामध्ये बसून अशा प्रकारे चहा बिस्किट खाल्यामुळे सभापतीही नाराज झाल्या आहेत. सभागृहाच्या अध्यक्षा संध्या राय यांनीही विरोधकांच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “विरोधी सदस्यांचे हे वर्तन योग्य नाही. ते लोकशाहीच्या प्रतिष्ठेचेही उल्लंघन करते. जनता त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.” राय यांनी विचारले, “आपण या देशातील तरुणांना काय शिकवत आहोत?” त्यानंतर त्यांनी सभागृह दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.






