पूर्वोत्तर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील 17 राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी मान्सून लवकरच दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने तूफान बॅटिंग केली आहे. त्यातच आता पूर्वोत्तर राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, भारताच्या पूर्वेकडील राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये जोरदार विजा चमकण्याचा व गडगडाट होण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारताच्या राज्यांच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, केरळ आणि किनारपट्टीवरील राज्यांमध्ये अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
खास करून केरळ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिजोराम या राज्यांमध्ये पुढील 7 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतात कोसळधार
जम्मू काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये 3 जूनपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभगाने तसा अंदाज वर्तवला आहे.
कोणत्या राज्यात कसे असणार हवामान?
३० ते १ जूनपर्यंत महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार या राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज आणि उद्या गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.
India Weather Update: देशातील ‘या’ राज्यांत मान्सून दाखल; कुठे होणार मुसळधार पाऊस? वाचा…
राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट
गेले अनेक दिवस राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून, मुंबई-ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला. पुढील 3-4 दिवसांत राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातचता राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.