‘पाण्याखाली जे पाहिलं ते धक्कादायक...’; स्कूबा डायव्हिंगनंतर राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
Rahul Gandhi Statement News Marathi : काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. कधी ते ट्रक ड्रायव्हर्ससोबत प्रवास करतात, तर कधी शेतकऱ्यांसोबत शेतात दिसतात. पण यावेळी त्यांनी एक पूर्णपणे नवीन आणि आश्चर्यकारक बाजू समोर आणली आहे. राहुल गांधी यांनी ग्रेट निकोबारच्या पाण्यात स्कूबा डायव्हिंग केले. या पाण्याखालील साहसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी केंद्र सरकारच्या निकोबार मेगा प्रोजेक्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं की, विकासाच्या नावाखाली बेटाचे पर्यावरण कायमस्वरूपी नष्ट केले जात आहे.
राहुल गांधी सध्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्यावर आहेत. ग्रेट निकोबारच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी तेथील सुंदर पाण्यात स्कूबा डायव्हिंग केले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पाण्याखालील चित्तथरारक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधी व्यावसायिक स्कूबा गिअर घालून सागरी जीवन आणि रंगीबेरंगी प्रवाळ खडकांचे कौतुक करताना दिसत आहेत.
केंद्र सरकार ग्रेट निकोबारमध्ये एक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करत आहे. या महाप्रकल्पात आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, वीज प्रकल्प आणि नवीन संरक्षण तळाच्या बांधकामाचा समावेश असेल. सरकारचा विश्वास आहे की, हा प्रकल्प भारतासाठी सामरिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल आणि व्यापाराला चालना मिळेल.
समुद्रातून बाहेर आल्यानंतर राहुल गांधींनी या प्रकल्पावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ग्रेट निकोबारचा हा प्रदेश जगातील सर्वात संवेदनशील परिसंस्थांपैकी एक आहे. या महाप्रकल्पामुळे पाण्याखालील प्रवाळ आणि सागरी जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होईल. राहुल यांनी इशारा दिला की, जर सरकारने आपला हट्ट सोडला नाही, तर विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा एक अनमोल खजिना कायमचा गमावून बसू. त्यांनी याला पर्यावरणाविरुद्धची एक मोठी कुरापत म्हटले.
यावेळी सोशल मीडियावर पोस्ट करताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, केवळ पर्यावरणाचाच नव्हे, तर तिथे राहणाऱ्या मूळनिवासी लोकांच्या समस्यांचाही मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, हा भव्य प्रकल्प स्थानिक आदिवासी लोकांच्या घरांना आणि संस्कृतीला धोका निर्माण करतो. लाखो झाडे तोडली जातील, ज्यामुळे बेटाचे संतुलन पूर्णपणे बिघडेल. राहुल गांधी म्हणतात की, आम्हाला असा विकास नको आहे जो आपली जंगले, महासागर आणि मानवाच्या किंमतीवर होतो.
या फोटोंमुळे आणि राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे इंटरनेटवर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेस समर्थक आणि पर्यावरणवादी राहुल गांधींच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी याला विकासविरोधी म्हणत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, हा प्रकल्प देशाच्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे.
“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक






