मासिक पाळी नसताना सुद्धा अतिरक्तस्त्राव होतो? महिलांना 'या' आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात गंभीर लक्षणे
मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे?
अतिरक्तस्त्राव होण्याची कारणे आणि त्यामागील आजार?
वाढत्या वयात महिलांना कोणत्या आजाराची लागण होते?
सर्वच महिलांनी स्वतःची आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कौटूंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढलेला तणाव, मुलांची जबाबदारी, शारीरिक आणि मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे खूप जास्त दुर्लक्ष करतात. वय वाढल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. पण घरातील कामांमधून आराम करण्यास वेळ मिळत नाही. असे न करता शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना रक्तस्त्राव होतो. पण काहीवेळा मासिक पाळी व्यतिरिक्त होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष केले जाते. पण या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष करणे शरीरासाठी जीवघेणे ठरू शकते. वयाच्या ४० व्या वर्षानंतर शरीराला कोणत्याही आजाराची लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
व्य वाढल्यानंतर वेळोवेळी योग्य त्या रक्त तपासण्या करून घेणे फार आवश्यक आहे. महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे गंभीर आजाराची लागण होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यामुळे जीव सुद्धा गमवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी व्यतिरिक्त कोणत्या कारणांमुळे अतिरक्तस्त्राव होण्याची शक्यता असते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि खूप जास्त थकवा वाढू लागतो. रक्त कमी झाल्यानंतर वाढलेला थकवा काही केल्या लवकर कमी होत नाही. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
दोन पाळींच्या दरम्यान होणारा रक्तस्त्राव, लैंगिक संबंधानंतर होणारा जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव ही स्थिती असामान्य रक्तस्त्राव मानली जाते. तर काहीवेळा गर्भधारणेदरम्यान कमी-अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होतो. मात्र हा स्त्राव काहीवेळा हलक्या डागांच्या स्वरूपात असतो तर कधी कधी खूप जास्त प्रमाणात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार तुम्हाला रक्तस्त्राव होत असेल तर वेळीच तपासण्या करून शरीराची काळजी घ्यावी.
वय वाढल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात. हे बदल काहीवेळा अतिशय सामान्य असतात तर काहीवेळा अतिशय गंभीर सुद्धा असतात. शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स मासिक पाळी नियंत्रणात करते. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम होतो आणि रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे काहीवेळा अधून मधून रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
गर्भाशयात तयार होणाऱ्या कर्करोग नसलेल्या फायब्रॉइड्स गाठी वाढल्यानंतर अतिप्रमाणात रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पोटात वेदना आणि रक्तस्त्राव होतो. पॉलिप्स गर्भाशयात किंवा गर्भाशयग्रीवेतील लहान गाठी आहेत. या गाठी वाढल्यानंतर कधीकधी रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक हार्मोनल समस्या आहे. यामुळे मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात. ज्याच्या परिणामामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते.
Ans: हार्मोनल असंतुलन, गर्भाशयातील फायब्रॉईड्स, पॉलिप्स, PCOS, एंडोमेट्रिओसिस, थायरॉईड विकार किंवा काही संसर्ग यांमुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.
Ans: होय. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि मधूनमधून रक्तस्त्राव दिसू शकतो.
Ans: होय. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समधील असंतुलनामुळे मासिक पाळीचे चक्र बिघडून असामान्य रक्तस्त्राव होऊ शकतो.






