आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर (संग्रहित फोटो)
पुणे : आंबेगाव तालुक्याला नाव देणारे ऐतिहासिक आंबेगाव गाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली आहे. धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर आला आहे. सध्या डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तो अवघ्या दहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणाच्या पोटात लपलेले जुने आंबेगाव पुन्हा एकदा दिसू लागले आहे.
डिंभे धरणातील पाणी कमी झाल्याची माहिती मिळताच विस्थापित गावकरी आणि पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. पाण्याच्या गर्भात लपलेले जैन मंदिर, जुन्या वस्तीचे अवशेष आणि बाजारपेठेच्या खुणा पाहून गावकऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मात्र, या आठवणींसोबत विस्थापनाच्या जखमाही पुन्हा ताज्या होत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी मावळ खोऱ्यातील व्यापारी केंद्र असलेल्या या गावातून परिसरातील अनेक गावांचा आर्थिक व्यवहार चालत असे. त्यामुळे या गावाशी अनेक कुटुंबांच्या भावना जोडलेल्या आहेत.
दरम्यान, विकासासाठी दिलेल्या त्यागाची आठवणही करून देत आहे. या गावाशी अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे गाव पाण्यावर आल्याचं ऐकताच अनेक जणांची पावलं आपोआप जुन्या आंबेगावाच्या दिशेने गेल्याचे पाहायला मिळालं. हा त्या गावकऱ्यांसाठी एक भावनिक क्षणच म्हणावा लागेल. धरणाचं पाणी कमी झाल्याने पुन्हा एकदा जुनं आंबेगाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या तिथे गर्दी पाहायला मिळत आहे.
गाव विसावले धरणाच्या पाण्याखाली
आंबेगाव तालुक्याचे नाव ज्या आंबेगाव गावावरून पडले, तेच गाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली कायमचे विसावले आहे. मावळ खोऱ्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या गावाचे धरण प्रकल्पासाठी विस्थापन करण्यात आले होते. सध्या डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तो अवघ्या दहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणाच्या पोटात लपलेले जुने आंबेगाव पुन्हा एकदा दिसू लागले आहे.
मीना नदीवरील बंधारे पडले कोरडे; आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली






