(फोटो सौजन्य: istock)
शरीर घड्याळ्याच्या काट्यांच्या तालावर चालते
आम्ही तुम्हाला सांगतो की,सकाळच्या वेळी तुमच्या शरीराची चयापचय प्रक्रिया जलद असते याचाच अर्थ या वेळेत अन्न लवकर पचते. पण वेळ जसजसा पुढे जातो तसतशी ही क्रिया मंदावत जाते. सकाळी जड पदार्थ खाल्ले तरी ते सहज पचू शकतात पण रात्रीच्या वेळी तसे होत नाही. अन्न चांगले पचले की हार्मोन्स संतुलित राहतात. जर तुम्ही रात्री असे केले, तर तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि कॅलरीज अधिक खर्च होऊ लागतात.
सकाळी इन्सुलिनची संवेदनशीलता जास्त असते
सामान्य निरोगी व्यक्तींमध्ये सकाळी इन्सुलिनची संवेदनशीलता जास्त असते. याचा अर्थ शरीर सकाळी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचा अधिक प्रभावीपणे वापर करते. परंतु संध्याकाळी मात्र ही प्रक्रिया मंदावत जाते आणि ग्लुकोज चरबीच्या रुपात साठवले जाते. यामुळे मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
अति प्रमाणात खाणे
घ्रेलिन आणि लेप्टिन हे दोन हार्मोन्स आहेत जे तुमच्या मेंदूला भुकेचा संकेत देतात. सकाळचा नाश्ता न केल्याने त्यांचे संतुलन बिघडू शकते, त्यामुळे एकवेळ रात्राीचे जेवण स्कीप करता येते पण सकाळचा नाश्ता चुकुनही टाळू नये. जे लोक सकाळी भरपूर नाश्ता करतात त्यांना दिवसभर कमी भूक लागते.
रात्री चुकीचा पर्याय निवडणे
अनेकांना मिड नाईट भूक लागते आणि अशावेळी अधिकतर लोक चिप्स, नूडल्स,फास्ट फूड, तळलेले पदार्थ अशा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करतात. असं केल्याने रात्री पचनक्रिया मंदावत असल्याने हे पदार्थ चरबीच्या रूपात साठवले जातात कारण त्यांचे पचन होत नाही.
झोप न लागणे
रात्री जड अन्नाचे सेवन केल्याने आपल्या झोपेवर याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः जर तुम्ही चरबी किंवा साखर जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करत असाल. याव्यतिरिक्त तुम्हाला आरोग्याच्या इतरही समस्या जाणवू शकतात ज्यात छातीत जळजळ होणे, रक्तातील साखर वाढणे, अस्वस्थता अशा समस्यांना समावेश होतो.
‘गंगा एक्सप्रेस वे’चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग
नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरते






