रोजच्या जेवणात 'या' हेल्दी आणि पौष्टिक भाज्यांचा करा समावेश, विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यासोबतच अशक्तपणा होईल कमी
विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे?
विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?
अशक्तपणा कशामुळे वाढतो?
कायमच निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची सामान आवश्यकता असते. विटामिन सी, विटामिन बी १२, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इत्यादी सर्वच विटामिनची शरीराला आवश्यकता असते. कोणतेही एक विटामिन कमी झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक पोषण देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. विटामिन बी १२ शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विटामिन बी १२ हाडांच्या आतील बोन मॅरोमध्ये असते. त्यामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भासु लागल्यानंतर थकवा, अशक्तपणा येेणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसु लागतात. तर काहीवेळा हात-पाय थंड पडणं, छातीत जळजळ इत्यादी लक्षणे वाढून शरीराला हानी पोहचते. त्यामुळे विटामिन बी १२ ची वाढती कमतरता आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात या पालेभाज्यांचा समावेश करावा. या भाज्या शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)
वर्षाच्या बाराही महिने बाजारात पालक भाजी उपलब्ध असते. विविध पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये मुबलक प्रमाणात फोलेट, लोह, क्लोरोफिल इत्यादी घटक आढळून येतात, जे रक्तातील पेशी तयार करण्यास मदत करतात. नियमित पालक खाल्ल्यास शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहते आणि थकवा कमी होतो. विटामिन बी १२ ची भरून काढण्यासाठी पालक नेहमीच खावे. पालकाची भाजी, सूप किंवा डाळ-पालक असे विविध पदार्थ बनवून खावेत.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना शेवग्याची पाने खायला अजिबात आवडत नाही. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली शेवग्याची पाने शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. या भाजीमध्ये विटामिन, कॅल्शियम, लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते. विटामिन बी १२ ची पातळी संतुलित ठेवण्यासाठी शेवग्याची भाजी खावी.
लोहाने समृद्ध असलेले बीट आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा खावे. ॲनिमियासारख्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या लोकांसाठी बीट वरदान ठरेल. यामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स, फोलेट आणि मँगनीजसारखे घटक आढळून येतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. कच्चे बीट खाल्ल्यानंतर ते सहज पचन होत नाही, अशावेळी शिजवलेले बीट खावे. बीटचे सॅलड किंवा बीटपासून बनवलेले विविध पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
भारतामध्ये गवार सहज उपलब्ध होते. त्यामुळे आहारात गवरचा समावेश करावा. गवारच्या शेंगांमध्ये फायबर, खनिजे आणि विटामिन्ससोबतच फोलेटसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गवार खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला खूप जास्त फायदे होतात. याशिवाय आहारात मेथीची भाजी आणि वेगवेगळ्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
Ans: पालक, मेथी, शेपू, ब्रोकोली, बीटरूट आणि हिरव्या पालेभाज्या फोलेट, लोह आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असल्याने शरीराला पोषण मिळण्यास मदत होते. मात्र, या भाज्या विटामिन बी १२ चा थेट स्रोत नाहीत.
Ans: दूध, दही, पनीर, फोर्टिफाइड धान्ये आणि फोर्टिफाइड प्लांट-बेस्ड दूध यांचा आहारात समावेश करावा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बी १२ सप्लिमेंट घ्यावे.
Ans: सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि श्वास लागणे ही सामान्य लक्षणे असू शकतात.






