केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी 'या' पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर
सर्वच महिलांना घनदाट आणि मजबूत केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर काहीवेळा वेगवेगळे हेअर शाम्पू, हेअर सीरम किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार चुकीच्या पद्धतीने शाम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यास केस आणखीनच कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या मुळांना आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे केस कमकुवत होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केसांच्या घनदाट वाढीसाठी कायमच घरगुती उपाय करावेत. धूळ, प्रदूषण आणि कडक उन्हात जास्त वेळ बाहेर फिरल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे केस ओले होतात आणि केसांमध्ये कोंडा वाढतो.टाळूवर वाढलेल्या कोंड्यामुळे केसांना खूप जास्त खाज येते.(फोटो सौजन्य – istock)
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता जाणीव मानसिक तणाव वाढल्यामुळे केवळ शरीरावरच नाहीतर त्वचा आणि केसांवर सुद्धा परिणाम दिसू लागतात. त्यामुळे केस स्वच्छ आणि कायमच चमकदार ठेवण्यासाठी कोणत्याही हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. केळीची साल केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. केळी खाल्ल्यानंतर साल फेकून दिली जाते. पण असे न करता केळीची साल ठेवून त्याचा हेअर मास्क बनवून केसांवर लावावा. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे केसांची वाढ होते आणि केस सुंदर दिसतात.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताज्या केळीच्या सालीचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक पेस्ट करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात खोबरेल तेल किंवा दही घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासुन ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर हेअर मास्क ४० मिनिटं केसांवर लावून तसाच ठेवा. हेअर मास्क धुवून टाकण्याआधी हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे टाळूवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते.
केळीची साल केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यास मदत करतो. ४० मिनिटं झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. केळीच्या सालीचा हेअरमास्क लावल्यामुळे केस अतिशय सॉफ्ट आणि मुलायम होतील. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. खोबरेल तेल किंवा दह्याचा वापर केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहील आणि केस मुलायम होतील. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. केस स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.






