(फोटो सौजन्य: Pinterest)
India’s Mini Israiel: कमी बजेटमध्ये विदेश यात्रा करायचीये? मग भारतातील या ठिकाणाला भेट द्या
टाळूवर खाज आणि कोंडा का होतो ?
घामामुळे स्कॅल्प तसाच ओलसर राहतो. आणि वेळेवर डोकं स्वच्छ नाही केलं, तर हा ओलसरपणा बुरशीला कारणीभूत ठरते. त्यामुळे कोंडा, कोरड्या त्वचेसारखे खवले निघणं आणि सतत खाज येण्याची समस्या निर्माण होते.
तेलकटपणा आणि दुर्गंधीची समस्या
जास्त घाम आला आणि तो टाळूतील नैसर्गिक तेलात मिसळला की केस लगेचच चिकट आणि तेलकट दिसायला लागतात. टाळूही जड वाटू लागते आणि कधी कधी वासही येतो. त्यामुळे केस फ्रेश आणि स्वच्छ दिसत नाहीत.
केस गळण्याची शक्यता
टाळूवर सतत घाम आणि घाण राहिली तर केसांच्या मुळांना त्रास होतो. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि जास्त गळू लागतात. म्हणून टाळू स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे.
हायड्रेशन आणि आहार महत्त्वाचा
पुरेसं पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. यामुळे केस आणि टाळू आतून निरोगी राहतात. जास्त प्रॉडक्ट्स टाळा: जेल, स्प्रे किंवा जड स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरल्यास घाम आणि धूळ केसांमध्ये अडकते. त्यामुळे शक्यतो हलके प्रॉडक्ट्स वापरा.
नियमित स्वच्छता ठेवा
आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा. घाम आल्यानंतर केस कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. हवेची देवाणघेवाण होईल अशी हेअरस्टाईल ठेवा. घट्ट हेअरस्टाईल्सऐवजी सैल वेणी, पोनीटेल किंवा बन ठेवल्यास टाळूला हवा मिळते.
नैसर्गिक घटकांचा वापर करा
कोरफड, कडुलिंब किंवा टी ट्री ऑइलयुक्त उत्पादनं टाळू स्वच्छ ठेवायला आणि जळजळ कमी करायला मदत करतात.
ओला टाळू ठेवू नका
घाम आल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतर टाळू जास्त वेळ ओला ठेवू नका.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






