वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस...
लिंबू पाणी पिण्याचे फायदे?
आवळ्याचा रस पिण्याचे फायदे?
उन्हाळ्यात कोणते पेय प्रभावी ठरते?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अंगाची काहिली होते. कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर काहींना डोकेदुखीची समस्या उद्भवते. सतत येणाऱ्या कडक घामामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीर पूर्णपणे डिहायड्रेट होऊन जाते. अशावेळी सगळेच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सरबत किंवा कोल्ड्रिंकचे सेवन करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंड पेय प्यायली जातात. पण थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी न होता आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. बाजारात मिळणारी थंड पेय शरीराची तहान भागवतात, पण शरीरात थंडावा निर्माण करत नाहीत. या पेयांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि घटक आढळून येतात, ज्याचा शरीराला फारसा फायदा होत नाही. वेगवेगळ्या रासायनिक रंगांचा वापर करून बनवलेल्या पेयांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या नैसर्गिक पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीरासाठी लिंबू पाणी प्रभावी ठरते की आवळ्याचे सरबत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
नैसर्गिक पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू सरबत पितात. लिंबू सरबत किंवा आवळ्याचे सरबत प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते. उन्हाळ्यात या दोन्ही पेयांचे आवर्जून सेवन केले जाते. लिंबू सरबत प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करते तर आवळ्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. या दोन्ही पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विटामिन सी असलेल्या पेयांचे सेवन केल्यास शरीरासह त्वचेला सुद्धा फायदे होतील. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. पण आरोग्यासाठी लिंबू पाणी की, आवळा सरबत?
घरात कायमच लिंबू उपलब्ध असतात. एक ग्लासभर पाण्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ, थोडीशी साखर मिक्स करून सरबत बनवले जाते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील क्षार बाहेर पडून जातात, ज्यामुळे थकवा जाणवतो. अशावेळी लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील क्षारांची पातळी भरून निघते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास कमी होतो. यामध्ये असलेले विटामिन सी शरीर हायड्रेट ठेवते आणि उन्हामुळे आलेला काळपटपणा कमी करण्यास मदत करते.
आयुर्वेदानुसार, आवळा शरीरासाठी अमृता समान मानला जातो. आवळा अतिशय थंड असल्यामुळे नियमित आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतात. एका आवळ्यामध्ये साधारण २० लिंबांइतके विटामिन सी असते. त्यामुळे नियमित एक आवळा खावा. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच उपाशी पोटी आवळ्याचा रस प्यायल्यास रक्तातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. उन्हाळयात येणारी घामोळे कमी करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर तर पित्ताचा त्रास, डोळ्यांची जळजळ किंवा पित्ताचा खूप जास्त त्रास होत असेल तर आवळ्याचे सरबत प्यावे. यामुळे उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारेल.
Ans: जास्त वेळ उन्हात राहणे टाळा, घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.
Ans: कलिंगड काकडी टरबूज यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.
Ans: पुरेशी झोप घ्या आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी तणावमुक्त राहा.






