• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajit Pawar Has Made A Big Statement Regarding Farmer Loan Waiver Nrdm

कर्जमाफीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, पुढच्या वर्षी…

यावर्षी आणि पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावीच लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2025 | 01:09 PM
ncp dcm ajit pawar kolhapur live press confernce daily political news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती : कर्जमाफी होईल, या आशेने शेतकरी कर्जाची रक्कम बँकेत भरत नसल्याचे दिसत आहे, मात्र सध्या राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकेत भरावी, यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना वीज बील माफी, लाडकी बहीण योजना, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन यासह इतर योजनांसाठी तब्बल सव्वाचार लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागली, त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावीच लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले. परिस्थितीनुरूप आगामी काळात निर्णय घेऊ, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, बाळासाहेब तावरे, विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, योगेश जगताप, नितीन सातव आदींसह इतर संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी राज्यात अनेक ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी आपली कर्जाची रक्कम भरत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. कर्जमाफी होईल या आशेने शेतकरी कर्ज भरत नाहीत. मात्र सगळी सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. मी अर्थमंत्री म्हणून ११ अर्थसंकल्प जाहीर केले. नुकताच ७ लाख ३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वीज बिल माफीसाठी देण्यात आली. शेतकऱ्यांना विज बिल माफ झाले असले तरी ती रक्कम शासनाला महावितरण कंपनीला द्यावी लागली आहे. लाडक्या बहिणींसाठी ४५ हजार कोटींची तरतूद करावी लागली.

साडेतीन लाख कोटी रुपये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देण्यात आली. पेन्शनर्स तसेच शासनाने घेतलेल्या कर्जाच्या व्याजासाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तब्बल सव्वाचार लाख कोटी रुपये या सर्व गोष्टींसाठी द्यावे लागले. उर्वरित रक्कम शाळा, शालेय साहित्य, विद्यार्थ्यांचे गणवेश, वसतिगृह त्याचबरोबर रस्ते, वीज, पाणी व इतर मूलभूत गरजांसाठी द्यावे लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावेच लागणार आहेत, ३१ मार्च पूर्वी सदर रक्कम जमा करावी. यावर्षी व पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावी लागेल. परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ मात्र सध्या कर्जमाफीची परिस्थिती शासनाची नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. दुधाला जाहीर केल्याप्रमाणे अनुदानाची रक्कम शासनाने दिली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

मळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता असल्याचे सांगत कारखान्यात चुकीचे काम आपण कधीही होऊ देणार नाही, ठराविक लोकांनाच पगारवाढ दिल्याची तक्रार माझ्याकडे आल्यानंतर आपण तो निर्णय थांबवण्याचे आदेश दिले. याबाबत संचालक मंडळाची बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. केंद्र अथवा राज्य सरकारमधले कोणतेही काम आता अडणार नसून साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय आपल्यामुळे झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवरायांच्या राज्यापूर्वी निजामांचे, आदिलशहाचे, मुघलांचे राज्य होते. मात्र छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले राज्य भोसल्यांचे राज्य म्हणून न ओळखता रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. या ठिकाणी माळेगाव कारखान्याने उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्यामुळे या परिसरातील सौंदर्यात मोठी भर पडली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Ajit pawar has made a big statement regarding farmer loan waiver nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Farmers
  • maharashtra
  • Maharashtra Goverment

संबंधित बातम्या

Fake Herbicide : पंढरपूर तालुक्यात बोगस तणनाशकाचा हाहाकार; शेतकऱ्यांना मोठा फटका
1

Fake Herbicide : पंढरपूर तालुक्यात बोगस तणनाशकाचा हाहाकार; शेतकऱ्यांना मोठा फटका

तुम्ही लायकीत राहा, नाहीतर हातपाय तोडून…; बारामतीत कंपनीतील कामगारांना दांडक्याने मारहाण
2

तुम्ही लायकीत राहा, नाहीतर हातपाय तोडून…; बारामतीत कंपनीतील कामगारांना दांडक्याने मारहाण

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती
4

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Honey Trap Case : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…

Honey Trap Case : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…

Haval H9 मिळून 1 महिना होत नाही तोच Abhishek Sharma ने खरेदी केली Ferrari Purosangue, किंमत वाचूनच चक्रवाल

Haval H9 मिळून 1 महिना होत नाही तोच Abhishek Sharma ने खरेदी केली Ferrari Purosangue, किंमत वाचूनच चक्रवाल

Idli-Sambhar History:  इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?

Idli-Sambhar History: इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?

काँग्रेस सरकारने देशातील लाखो गरिबांना जमिनी दिल्या, पण मोदी सरकारने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

काँग्रेस सरकारने देशातील लाखो गरिबांना जमिनी दिल्या, पण मोदी सरकारने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त 

IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त 

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

BMC Election: जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना; BMC निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा ट्विस्ट

BMC Election: जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना; BMC निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा ट्विस्ट

व्हिडिओ

पुढे बघा
‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.