या ग्राहकांकडे ५२ कोटी ९६ लाख ५४ हजार रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. यापैकी १५ हजार ४११ ग्राहकांकडे तब्बल २४ कोटी ८३ लाख ११ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठाखंडित करण्यात आला आहे. महावितरणने थकबाकीदारांना वारंवार नोटिसा, जनजागृती आणि हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, अनेक ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली. महसूल वसुलीला गती देण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना थकीत वीजबिले तातडीने भरून वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा नियमानुसार वीजजोडणी कायमस्वरूपी तोडण्यासह पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
थकबाकीची रक्कम भरल्यानंतर नियमानुसार वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. थकबाकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्याकडील थकीत बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले.
महावितरण बुलढाणाचे अधीक्षक अभियंता, धनंजय अहेर म्हणाले की, महावितरणच्या थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडणी मोहीम सध्या सुरू असल्याने वीज ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी वीज बिलाचा भरणा करून विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा.






