हिंगोली जिल्हा परिषदच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
Hingoli News : हिंगोली : राज्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या (Political News) वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने सोमवार २३ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह पाचही पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. (Hingoli News)
राज्यामध्ये शासकीय व निमशासकीय शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चौधा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करावी, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदानामध्ये बदल करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंधारण विभागामध्ये समावेशन करू नये यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग
विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने काळ्याफिती लावून कामकाज केले होते. यावेळी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही या मागण्या मान्य झाल्याच नाही. त्यामुळे आज संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७०० पेक्षा अधिक लिपिक वर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा नागनाथ पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे.
हे देखील वाचा : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी
प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा रोष
राज्यामध्ये शासकीय व निमशासकीय शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चौथा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करावी, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदानामध्ये बदल करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, जिल्हा परिषदेमधील कर्मचा-यांचे मृद व जलसंधारण विभागामध्ये समावेशन करू नये यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन करण्यात आले. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने काळ्याफिती लावून कामकाज केले होते. या मागण्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
हे देखील वाचा : भाजप कार्यकारणीत मोठा ट्वीस्ट; सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची वर्णी
जिल्हाभर लिपिकांचा संप यशस्वी, अनेकांचा सहभाग
मात्र त्यानंतरही या मागण्या मान्य झाल्याच नाही. त्यामुळे आज संघटनेच्या वतीने काम बंट आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७०० पेक्षा अधिक लिपिक वर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा नागनाथ पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे दरम्यान संघटनेचे पालक अध्यक्ष संतोष बांगर, जिल्हाध्यक्ष राजीव घुगे, उपाध्यक्ष निती दहिफळे, सचिव अविनाश दराडे, सारंग गायकवाड, वामन गाडेकर, प्रसाद घंटाराम, शिवाजी हाके, उदय देशपांडे, संदीप अन्नदाते, प्रवीण काळबांडे, विवेक दळवी, तुकाराम हमाने, राजेश कोंडावार, नंदकिशोर परीहार, लक्ष्मीकांत क्षीरसागर यांच्यासह जिल्हाभरातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.






