टोरंट वीज प्रकल्पामुळे धरण परिसरात तब्बल 25 हजार झाडे तोडली जात आहेत.त्यामुळे प्रदूषणाचा विषय समोर येणार असून हे धरण व्हावे किंवा नाही याबाबत परिवाराण विषयक जनसुनावणी कर्जत जवळची गौरकामत येथे घेण्यात आली. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र ससाणे टोरंट कंपनीला रेड कार्पेट दाखवत हा प्रकल्प उभारण्यास केंद्रीय परिवाराण मंत्रालयाची परवानगी आहे असा दखला दिला. मुळात या प्रकल्पमुळे हजारो एकर वन जमीन वापरली जाणार असून वन जमीन स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी दिली जात नाही, मग टोरंट कंपनीला2100 हेकटर जमीन धरण बांधण्यासाठी कशी दिली जाते? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आयात या भागातील शेतकरी आक्रमक झाला असून या शेतकऱ्यांनी धरणाला विरोध करण्यासाठी आरपारची लढाई पुकारली आहे. टोरंटो कंपनीच्या विरोधात रात्री पाली येथे मिटींग घेण्यात आली.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी जिल्हा परिषद सदस्य मारूती तथा बाबू घारे सामाजिक कार्यकर्ते जगदिश ठाकरे लहु श्रीखंडे चेतन पवाळी सुनिल मसणे चंदू हगवणे सुरेश मसणे पप्पु देशमुख यांसह आंबोट पोटल पाली येथील ग्रामस्थ व बाधित आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या मिटींगमध्ये टोरंटो कंपनी आदिवाशींवर अन्याय करत आहेत याचा आदिवाशींनी सर्वांसमोर पाढाच वाचला.आदिवासींचे फॅारेस्टच्या जमिनीत दली प्लॅाट दिलेले आहेत. सदर प्लॅाटमध्ये मागे शासनाची कामे केली गेलेली आहेत तसेच त्या प्लॅाटमध्ये आदिवाशींनी आंबा लागवड करून शेती करत आहेत. परंतु सदर जागा टोरंटो प्रकल्पामध्ये जात असल्याने फॅारेस्ट विभागाचे अधिकारीटोरंटो कंपनीच्या दबावामुळे आदिवासींना ही जमीन तुमची नाही असे आदिवासींची फसवणुक करत आहेत. या प्रकल्पामुळे होणारे नुकसान निसर्गाचे व पर्यावरणाची होणारी हानी यावर चर्चा करण्यात आली टोरांटोचे चालू असलेले काम बंद करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचवेळी नजीकच्या काळात कर्जत तहसील कार्यालयाकडे मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.लवकरच या पायी मूक मोर्चाचे आयोजन करण्यासाठी बैठका घेण्यात येतील आणि सर्व गावकरी शेतकरी यांच्याकडून मोर्चाचे आयोजन केले जाईल असे यावेळी निश्चित करण्यात आले.






