Maharashtra Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पण सुनेत्रा पवार मात्र या भेटीवरून चांगल्याच नाराज झाल्याचे पाहालया मिळाले.
देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे यांच्याकडे या भेटी आपल्याला का सांगण्यात आले नाही, अशी विचारणा केली. आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी समर्थन देणार आहे. याचा महायुतीने वेगळा अर्थ काढू नये, यासाठी मुख्यमंत्र्यानी कल्पना देण्यासाठी बोलावले होते, अशी माहिती तटकरेंनी सुनेत्रा पवारांना दिली.
तसेच,”मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक बैठक राजकीय विषयावर नसते. जर एखाद्या राजकीय विषयावर चर्चा करायची असेल, तर आम्ही आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये त्यावर चर्चा करतो आणि सुनेत्रा वाहिनीला माहिती दिली जाते. यावेळी मी माझ्या मतदारसंघात कामासाठी गेलो होतो. त्यावर सुनेत्रा पवार यांना याबाबत काही सांगण्याची गरज नव्हती.” असही तटकरेंनी यावेळी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर, सुनेत्रा आणि त्यांचे पुत्र, पक्षाचे खासदार पार्थ पवार, यांनी पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. त्याचवेळी पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आण प्रफुल्ल पटेल यांना मात्र बाजूला केले जात असल्याची भावना आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यातील धुसफूसही समोर आली होती.






