श्रृंगारतळीत पथक दाखल (फोटो- istockphoto)
रहिवाशांना काळजा घेण्याची केली सूचना
तालुका आरोग्य विभाग खडबडून झाला जागा
दूषित जलस्रोतप्रकरणी शृंगारतळीत पथक दाखल
गुहागर: तालुक्यातील श्रृंगारतळी दूषित जलखीतप्रकरणी आरोग्य विभाग सतर्क झाले असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित इमारतीमधील रहिवाशांची भेट घेऊन उपाययोजना राबविल्या आहेत. रहिवाशांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.
श्रृंगारतळीत जलस्त्रोत दूषितच्चा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळंब रोड परिसरातील एका इमारतीतमधील जलस्त्रोत दुषितमुळे तेथील रहिवाशांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी व्यवस्था व त्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते आजुबाजूच्या जलस्रोत च बोअरवेलमध्ये जाते त्यामुळे उलटी, जुलाबाची साथ पसरली आहे.
तालुका आरोग्य विभाग खडबडून झाला जागा
अनेकांना जारचे पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. घटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आसीम साल्हे यांनी भेट दिली याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच तालुका आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. तातडीने आरोग्य पथक पाठवून तेथे उपाययोजना राबविण्याची सूचना तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जागीड यानी केली. चिखली प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांनी जाऊन तेथे नागरिकांची विचारपूस करुन उपाययोजना राबविल्या.
Health News: श्रृंगारतळीत उलटी, जुलाबाची साथ; जलस्रोत दूषित झाल्याने आजारांना निमंत्रण
श्रृंगारतळीत उलटी, जुलाबाची साथ
गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या श्रृंगारतळीतील काही इमारतींमधील रहिवाशांना दूषित जलखोतांमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी व्यवस्थेचा अभाव व पाण्याचा निचरा होत नसल्याने आजुबाजुच्या बोअरवेलमधील पाणी दुषीत झाले आहे. या पाण्यामुळे उलटी, जुलाबाची साथ पसरली असून अनेकांना जारचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. श्रृंगारतळीतील वेळंब रोड भागातील काही इमारतींमधील सांडपाणी सोडण्यासाठी इमारतीलगत टाक्या मारण्यात आल्या.
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात
मात्र, त्या टाक्या सांडपाण्यासाठी अपुऱ्या पडल्याने ते पाणी जिरुन जलस्रोतामध्ये मिसळून जाते. विशेष करुन बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या रहिवाशांना यामुळे दुषित पाण्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे साथीचे आजार पसरुन येथील आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. श्रृंगारतळीतील अनेक इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच मिळालेला नाही. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांना सार्वजनिक नळपाणी योजनेचा लाभच मिळालेला नाही. त्यामुळे बहुसंख्य इमारत मालकांनी बोअरवेल मारुन रहिवाशांना पाणीपुरवठा सुरु केला. मात्र, अशा बोअरवोरुमध्ये सांडपाणी जाऊन जलस्त्रोत दूषित होत आहेत. दरम्यान, गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या या दुषित जलस्त्रोताच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन कम्मिटीची बैठक अध्यक्ष अजित बेलवलकर चांच्या अध्यक्षतेखाली झाली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






