• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Konkan Farmers Crop Damage In Unseasonal Rain Weather Maharashtra Government News

कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात! अवकाळी पावसाने शेती, बागा उद्ध्वस्त; भाताचे रोप तर…

सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2025 | 03:07 PM
कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात! अवकाळी पावसाने शेती, बागा उद्ध्वस्त; भाताचे रोप तर...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शासनाला अहवाल पाठवणार: कृषी अधिकारी रवींद्र माळी
कोकणातल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज
दष्काळ घोषित करून तातडीची मदत देण्याची मागणी

खेड: तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. नुकतीच कापणीला आलेली भातशेती पावसाने पूर्णपणे उद्धवस्त केली असून, हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. गेल्या आठवडाभरात पडणाऱ्या सरींमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी भाताचे रोप पूर्णपणे चिखलात तुटून गेले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, १ नोव्हेंबरच्या पावसात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून, येत्या काही दिवसांत अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिली. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने वर्षभर पुरेल इतका तांदूळ मिळवण्यासाठी भातशेती करतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने ९० टक्क्यांपर्यंत नुकसान केले आहे.

केवळ आश्वासनांवरच मानावे लागले समाधान

यापूर्वीही सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले. यावेळी तरी शासन आणि लोकप्रतिनिधींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

दुष्काळ घोषित करून तातडीची मदत देण्याची मागणी

आता भातानंतर घेण्यात येणारी पावटा, तूर, कडवा आदी पिकांची पेरणीही हवामान अनुकूल नसल्याने धोक्यात आली आहे. आष्टी येथील शेतकरी वहाब सेन यांनी सांगितले की, ‘गेल्या पंधरा दिवसांच्या पावसामुळे कापलेली भातशेती चिखलात सडली आहे. या संकटातून सावरणे शेतकऱ्यांसाठी कठीण असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी.’ दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांनी कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यांवर वेळ न घालवता थेट ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

अवकाळीने हिरावला हातचा घास! ‘या’ तालुक्यात 508 शेतकऱ्यांचे…; काही दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता

अवकाळीने हिरावला हातचा घास

खेड तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्‌याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.

Web Title: Konkan farmers crop damage in unseasonal rain weather maharashtra government news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Crop damage
  • Farmers
  • Kokan News

संबंधित बातम्या

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
1

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
2

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?
3

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान
4

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

Jan 02, 2026 | 08:30 AM
Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Jan 02, 2026 | 08:20 AM
काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज; वादानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली कारवाई

काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज; वादानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली कारवाई

Jan 02, 2026 | 08:19 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Jan 02, 2026 | 08:15 AM
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

Jan 02, 2026 | 08:00 AM
Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Jan 02, 2026 | 07:59 AM
नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

Jan 02, 2026 | 07:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.