डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद
इमारतीमधील भागीदार रखमा पोखरकर यांनी सांगितले की, भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजली इमारत अतिधोकादायक झाली. या इमारतीत २७ भाडेकरु होते. इमारत अतिधोकादायक झाल्याने महापालिकेने अतिधोकादायक इमारत पाडण्याची नोटिस दिली. या नोटिस प्रमाणे ही इमारत जुलै २०२५ मध्ये पाडण्याचे काम सुरु केले गेले. अतिधोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली नाही. इमारतीचे पाडकाम अर्धवट केले आहे. तीन मजले पाडण्यात आले आहे. तळ अधिक पहिला मजला तसाच ठेवला आहे. तळ मजल्यावरील व्यापारी गाळे तसेच आहे. त्यात व्यवसाय सुरु आहे. इमारत धोकादायक होती तर तळ अधिक पहिला मजला का पाडला गेला नाही ? असा आमचा सवाल आहे. जोपर्यंत इमारत पूर्णपणे पाडली जात नाही. तोपर्यंत ही इमारत पुनर्विकासाकरीता देता येत नाही.
या इमारतीमधील भाडेकरु विजय भोईर यांनी सांगितले की, २७ भाडेकरुंपैकी केवळ १० भाडेकरुंनाच भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले आहे. उर्वरीत भाडेकरुंना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. भाडेकरु इतरत्र भाडे भरुन राहत आहे. किती दिवस अन्य ठिकाणी भाड्याने राहावे लागत आहे आम्हाला वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आयुक्तांनी ठोस कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
तसेच निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील (KDMC) महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






