(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेते नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सणांमध्ये दोघेही एकमेकांपासून लांब दिसत होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता या चर्चांना धक्कादायक पूर्णविराम लागण्याची शक्यता दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
नील भट्ट आणि ऐश्वर्या राय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, परंतु त्यांनी काही काळापासून एकमेकांशी संबंधित काहीही पोस्ट केलेले नाही, ज्यामुळे चाहत्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. एकेकाळी, दोघांचे रोमँटिक फोटो वारंवार समोर येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार नील आणि ऐश्वर्या वेगळे होत आहेत. त्यांनी अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यातील वादाचे नेमके स्वरूप आणि ते एकमेकांपासून वेगळे का होत आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये दोघांमधील अडचणींचा उल्लेख केलेला नाही.
नील आणि ऐश्वर्या टीव्ही शो ‘गम है किसी प्यार में’ च्या सेटवर भेटले होते, इथेच दोघांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती.
Rashmika-Vijay Wedding: विजय रश्मिका लवकरच होणार एकमेकांचे जोडीदार, ‘या’ ठिकाणी करणार थाटात लग्न
नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा दोघेही बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाले होते. या रिअॅलिटी शोमध्ये त्यांची एकत्र राहण्याची आणि प्रेमाने वागण्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. शो संपल्यानंतर काही काळ दोघांमध्ये सगळं आलबेल होतं, मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या चर्चांनी चाहत्यांमध्ये चिंता निर्माण केली.






