सावली मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहते त्यावेळी सावली दोन जुळ्या मुलांना जन्म देते. सावली आणि तिच्या मुलांना मारण्यासाठी राजकुमार गुंडांना पाठवतो पण त्याला काही यश मिळत नाही. सावलीचं एक बाळ जेव्हा राजकुमारने पाठवलेल्या गुंडांच्या तावडीत सापडतं त्यावेळी सारंग त्या बाळाला वाचवतो. सारंग या मुलीचा सांभाळ करायचं ठरवतो पण त्याला हेच माहिती नसतं ती की , ज्या मुलीला त्याने गुंडांच्या तावडीतून वाचवलं ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच मुलगी आहे. तर दुसरीकडे सावली तिच्या मुलाबरोबर मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहते. यामुळे अबीर म्हणजेच सावली आणि सारंगचा मुलगा याला लहानपणापासून वडिलांचं प्रेम मिळत नाही. भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जगन्नाथ असते.
याला धरुनच आता मालिकेता नवा प्रोमो दाखवण्यात आला आहे. सावलीचा मुलगा अबीर खेळत असतो. तेव्हा राजकुमारची गाडी भरधाव वेगाने येते. त्यावेळी या गाडीमुळे अबीरच्या कपड्यांवर चिखल उडतो. तेव्हा राजकुमार गाडीतून बाहेर येतो ऐतो आणि अबीरला ओरडतो. हे सगळं होत असताना जमलेला जमाव राजकुमारलाच बोलतात. तुमच्या गाडीमुळे त्याच्या कपड्यांवर चिखल उडाला त्यामुळे तुम्हीच त्याला सॉरी बोला असं त्याला सगळे सांगतात. त्यानंतर सावली अबीरला घेऊन पळत असते. त्यावेळी सावली पळत असतानाच एक गाडी समोर येऊन धडकते. त्या गाडीतून एक व्यक्ती बाहेर येते. त्या व्यक्तीच्या हातात काठी असते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जगन्नाथ म्हणजेच सावलीचे मानलेले वडिल तिला भेटतात. त्यावेळी जगन्नाथ आणि सावलीच्या डोळ्यातून देखील आनंदाचे अश्रू येतात.जगन्नाथची ही भेट सावलीच्या आयुष्यात नवी दिशा घेऊन येईल का ? जगन्नाथच्या येण्याने सावलीच्या आयुष्यातील संकटं दूर होतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.






