भारत-बांग्लादेश दौरा? (फोटो- ians)
भारत आणि बांग्लादेशच्या दौऱ्यात तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याबाबत शंका निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यात मिडिया राईट्स विक्रीच्या प्रक्रियेवर अचानक बंदी आणल्याचे समजते आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 2026-27 च्या प्रस्तावित दौऱ्यासाठी मीडिया राईट्ससाठी टेंडर काढण्याचे जाहीर केले होते. ज्यामध्ये भारत अन् बांग्लादेश मालिकेचा समावेश होता. 22 जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार होती असे समोर येत आहे. मात्र त्याआधीच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने टेंडरसंदर्भात निर्णय बदलला आहे. तसेच त्यांनी संपूर्ण प्रक्रिया होल्डवर ठेवली आहे. त्यामुळे ही मालिका होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातमी अपडेट होत आहे…






