फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय ध्वज न फडकवण्यावरून वाद आता चिघळत चालला आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा झाला. या सोहळ्याचा अलिकडेच पाकिस्तानमधील कराची स्टेडियमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये भारत वगळता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे फडकवले होते. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता या प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक मोठे विधान आले आहे.
WPL 2025 : आरसीबीचा सलग दुसरा विजय! 8 विकेट्सने केला दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
यंदा चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. पण भारताचा संघ या स्पर्धेसाठी सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानमध्ये जाणार नाही. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत असले तरी, टीम इंडिया त्यांचे सामने दुबईमध्ये खेळणार आहे. त्याचवेळी कराची स्टेडियममध्ये भारतीय ध्वज नसल्याने चाहत्यांमध्ये संताप दिसून येत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की हे निर्देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) आले आहेत आणि सामन्याच्या दिवशी फक्त चार झेंडे फडकवले जाणार आहेत.
#FirstSports: In the ongoing tension surrounding the ICC Champions Trophy, the omission of India’s flag at the Karachi stadium has sparked controversy. What was the reason behind Pakistan not hoisting the Indian flag? Is PCB playing politics? @rupharamani explains. pic.twitter.com/ItSWlIkDdM
— Firstpost (@firstpost) February 17, 2025
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “आयसीसीने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांच्या दिवशी फक्त चार झेंडे फडकवण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये आयसीसी (इव्हेंट ऑथॉरिटी), पाकिस्तान (इव्हेंट यजमान) आणि त्या दिवशी सामने खेळणाऱ्या दोन्ही संघांचे झेंडे असतील ते खूप सोपे आहे.”
पाकिस्तानचा संघ २०२५ चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करत आहे त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जाणार आहेत. आता, वृत्तांनुसार, रोहित शर्मा आणि त्याचा संघ कराची, लाहोर किंवा रावळपिंडीमध्ये एकही सामना खेळत नसल्यामुळे पाकिस्तानमधील या तीन ठिकाणी भारतीय ध्वज दिसणार नाही अशी शक्यता आहे.
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations.
– Absolute Cinema,… pic.twitter.com/2zmcATn7iQ
— Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) February 16, 2025
पाकिस्तानत्यांचा पहिला सामना उद्या म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे तर टीम इंडिया २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर, टीम इंडिया २३ फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तानशी सामना खेळेल. जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये आधीच बरीच क्रेझ आहे.