राष्ट्रकुल स्पर्धेचं थाटात उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारी भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत विजयाचे खाते खोलले. बॅडमिंटनटच्या मिश्र सांघिक स्पर्धेत (Badminton In Mixed Team Competition) भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pakistan) याच्यात लढत झाली. भारताने पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला.
भारताकडून सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने सामन्यात पाकिस्तानच्या मुहम्मद इरफान आणि गझला सिद्दीकी या जोडीला 21-9 आणि 21-12 च्या फरकाने मात देत 1-0 ची आघाडी घेतली. तर,
या सामन्यावळी भारतीय संघाकडून पाकिस्तानचा 5-0 अशा फरकाने पराभव करण्यात आला. अंतिम सामन्यावेळी गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांनी माहूर शहजाद आणि गझला सिद्दीकी या जोडीचा 21-4 आणि 21-5 असा पराभव केला. तर, अखेरच्या दोन सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने पाकिस्तानच्या मुराद अली आणि मुहम्मद इरफान यांना 21-12 आणि 21-9 च्या फरकाने मात देत भारताला 4-0 ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पाकिस्तानच्या महूर शेहजाद आणि गझला सिद्दकी यांना 21-4 आणि 21-5 अशा मोठ्या फरकाने मात देत सामना जिंकला आणि भारताला पहिल्या दिवशी पाकिस्तानवर 5-0 ने विजय मिळवून दिला.
पुरुष एकेरी सामन्यान बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पाकिस्तानच्या मुराद अलीला 21-7 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत भारताला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तर, ग्रुप ए मधील तिसरा सामना महिला एकेरीचा होता. ज्यात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने पाकिस्तानच्या महूर शेहजादला 21-7 आणि 21-6 अशा सरळ सेट्समध्ये सहज मात देत सामना जिंकला आणि भारताला 3-0 ची विजयी आघाडी मिळवून दिली.