शिक्षणमंत्र्याच्या राजीनामा नंतर पुण्यात जल्लोष (फोटो- सोनाजी गाढवे )
शिक्षणमंत्र्याच्या राजीनामा नंतर पुण्यात जल्लोष
सीजेपी केली आंदोलन मागे घेण्याची गोषणा
धर्मेंद्र प्रधान यांनी दिला पदाचा राजीनामा
सोनाजी गाढवे/पुणे: ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘छात्र एकता जिंदाबाद’, ‘जब जब सरकार डरती है हिंदू मुस्लिम करता है’, ‘दिल्ली चे ही तक्त राखितो महाराष्ट्र माझा’, ‘मेडवली खाओ खुद जन जाओ,’ ‘युवा शक्ती जिंदाबाद’, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, घोषणा देत गुडलक चौकात कॉकरोज जनता पार्टी, विविध संघटना, विद्यार्थ्या आणि (CJP Protest) नागरिकांनी यांनी एकच जल्लोषा केला.
पेपरफुटीच्या घटना, शिक्षणाचे खासगीकरण आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अभिजीत दीपके यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचे पूर्ण देशात पडसाद उमटल्याच्या नंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. राजीनाम्या नंतर राज्यसह पुण्यात गुडलक चौक कलाकार कट्टा येथे जल्लोष काण्यात आला. “शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला मात्र, सध्याची शिक्षण व्यवस्था बदली पाहिजे मंत्री येतील जातील परंतु व्यवस्था तशीच राहते. ती बदलणं गरजेचं आहे.” अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
यावेळी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मेलोडी वाटून आनंद उत्सव साजरा केला, हातात तिरंगा झेंडा भारत माता की जय, पेपर अभी झाकी है ‘ईवीएम’ अभी बाकी है, ही घोषणा देत विद्यार्थी आणि नागरिकांनी सांगीतले की आता आमच पुढच पाऊल हे ‘ईवीएम’ मशीन असणार आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना अन्यायाविरुद्ध विरुद्ध उभे राहतील असेही सांगत राष्ट्रगीताने जल्लोषाची सांगता करण्यात आली.
“राजीनामा झाला मात्र, ही शिक्षण व्यवस्था बदली पाहिजे मंत्री येतील जातील परंतु व्यवस्था तशीच राहते. ती बदलणं गरजेचं आहे.”
निखिल मगर (संशोधक विद्यार्थी)
“केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. मात्र, तात्कालिक परिस्थितीत घेतलेला योग्य निर्णय. परंतु यातून परीक्षेतील व्यवस्था परिवर्तनासाठी मूलभूत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. परीक्षा व्यवस्थेतील माफिया यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.”
-धनंजय कुलकर्णी माजी अधिसभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
“देशातील युवाशक्ती समोर केंद्र सरकारला अखेरीस झुकावे लागलेले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणे म्हणजे लाखो विद्यार्थींना न्याय मिळण्याची सुरूवात झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या नव्या लाटेची ही सुरूवात आहे. ज्या २१ विद्यार्थीनी आत्महत्या केल्या त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.”
– डॉ. राहुल ससाणे (विद्यार्थी आंदोलक)
एक महिन्याच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्यामुळे महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर,भगतसिंग यांचा आदर्श मनात बाळगत सावित्रीबाई च्या मार्गावर चालत महाराष्ट्राच्या लेकाने, अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक व सहकाऱ्यांनी, रस्त्यावर उतरलेल्या नव्या पिढीच्या लढ्याचे हे यश आहे. लोकशाहीचा हा विजय आहे.
-मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी प्रवक्ता
देशातील सजग युवक काय करू शकतो, याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे आजचा हा राजीनामा. हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून देशभरातील विद्यार्थी एकजुटीचा विजय आहे. राजीनामा मिळवणे हा संघर्षाचा पहिला टप्पा आहे. मात्र, शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर कायमस्वरूपी चाप बसला पाहिजे.
-अँड. कुलदीप अंबेकर संस्थापक, स्टूडंट हेल्पिंग हँडस
“भविष्यात कोणताही पेपरफुटीचा प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभागाची असेल. ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा धर्माची नव्हती. ही लढाई केवळ शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, स्थैर्य आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी होती.”
– ओमप्रकाश आदमवाड विद्यार्थी






