लॉर्ड्स क्रिकेट मैदान साधारणपणे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे चेंडूला अतिरिक्त स्विंग मिळतो, ज्यामुळे फलंदाजांना अडचणी येतात. म्हणून या सामन्यात वेगवान गोलंदाज आपले वर्चस्व गाजवू शकतात. या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे आव्हानात्मक असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आतापर्यंत , या मैदानावरकेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी ३५ सामने जिंकले आहेत. तर, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघानी ३३ सामने जिंकले आहेत. नाणेफेकीदरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, जर त्याने नाणेफेक जिंकली असती, तर त्याने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले असते.
कार्डिफमध्ये दुसरा एकदिवसीय सामना जिंकून इंग्लंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्या सामन्यात जो रूटने ९९ धावांची शानदार नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताविरुद्धच्या २१ द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांमध्ये इंग्लंडने आतापर्यंत केवळ सात वेळा विजय मिळवला आहे. त्यांनी शेवटचा एकदिवसीय मालिकेत भारताला २०१८ मध्ये पराभूत केले होते. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा विश्वास आहे की, त्याच्या संघात अंदाजापेक्षा खूपच चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. परंतु, भारत मालिका जिंकून आपली कामगिरी सुधारण्याच्या प्रयत्नात असेल.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.






