India vs Sri Lanka: 3 वॉर्म अप मॅच खेळणार (फोटो सौजन्य - X.com)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि संघ व्यवस्थापनाला या बदलाची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सामन्यांचे वेळापत्रक कमी करण्यामागे कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी कोलंबोसाठी रवाना होईल. हा तीन दिवसीय सराव सामना संपल्यानंतर, संघ गॉलसाठी रवाना होईल, जिथे १५ ऑगस्ट रोजी पहिला कसोटी सामना खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्ट रोजी कोलंबो येथील एसएससी स्टेडियमवर खेळला जाईल. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की हा सराव सामना थेट प्रक्षेपित केला जाईल.
दरम्यान १५ पैकी १२ खेळाडूंना श्रीलंकेत खेळण्याचा सराव नाही. सर्व खेळाडू अत्यंत नवीन असल्यामुळे भारताच्या संघासाठी ही मोठी कसोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल ९ वर्षांनी श्रीलंकेत हे कसोटी सामने खेळले जाणार आहेत. सगळ्यांचे आता या सामन्यांकडे लक्ष असून वर्ल्डकपच्या दृष्टीनेही हे सामने महत्त्वाचे मानले जात आहेत.
कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत भारतीय संघासाठी काही आनंदाची बातमी आहे. दुखापतीशी झुंज देणारा साई सुदर्शन वेगाने बरा होत आहे. पायाच्या बोटाच्या दुखापतीमुळे सुदर्शनची संघात निवड त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती, पण त्याने आता बंगळूरुमध्ये आपले पुनर्वसन पूर्ण केले असून फलंदाजीचा सराव पुन्हा सुरू केला आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराह आता गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून त्याने CoE येथे तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण केली आहे. तो आता कसोटी मालिकेत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघः शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन






