ईशा सिंगने जिंकले गोल्ड मेडल (फोटो- ट्विटर)
ISSF World Cup स्पर्धेत भारताची युवा स्टार नेमबाज ईशा सिंगने 25 मीटर महिला पिस्तूल प्रकारात अत्यंत चांगली कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑलिंपिक स्पर्धेत पदकविजेती असणारी मनू भाकरने याच प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. दोन्ही खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
A final bursting with talent ⭐ Esha Singh 🇮🇳 claims the World Cup win, followed by Zhang Yueyue 🇨🇳 taking silver and teammate Manu Bhaker 🇮🇳 claiming bronze!#ISSF #ShootingSport pic.twitter.com/vJ4EqEB4Sb — ISSF (@issf_official) July 27, 2026
ईशा सिंगने अंतिम सामन्यात सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखले होते. तिने पूर्ण सामन्यात चीनच्या यूयुए झांग या खेळाडूला तीन पॉईंट्सने पराभूत केले. ईशा सिंगने 50 शॉट्स स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. चीनची खेळाडू झांगने 37 पॉईंट्ससह रौप्यपदक जिंकले आहे. चीनमध्ये जाऊन चीनच्या खेळाडूला पराभूत करत गोल्ड मेडल जिंकल्याने ईशा सिंगसाठी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.
मनु भाकरला विचारला Vaibhav Sooryavanshi बाबत प्रश्न, भडकले चाहते; शेअर केला व्हिडिओ
मनू भाकरने पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकून इतिहास घडवला होता. मनू भाकरने पात्रता फेरीत 586 पॉईंट्ससह पहिले स्थान प्राप्त केले होते. तसेच अंतिम फेरीत चुरशीच्या सामन्यात तिने 28 पॉईंट्ससह कांस्यपदक जिंकले आहे. ईशा सिंगने भारतासाठी सुवर्णपदक आणि मनू भाकरने कांस्यपदक जिंकले आहे. यामुळे या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.
‘हा सामना माझ्यासाठी तणावपूर्ण होता. याआधी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे माझ्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र हा तणाव मी चांगल्या प्रकारे हाताळू शकले. मला सुवर्णपदक जिंकल्याचा मनापासून आनंद होत आहे,’ असे मत ईशा सिंगने व्यक्त केले आहे. तर ‘हे कांस्यपदक माझ्या पुढील म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्सच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले,’ असे मत मनू भाकरने प्राप्त केले आहे.
मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर! भीषण अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू
या स्पर्धेत पदकांच्या कमाइत चीन आघाडीवर आहे. चीनने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 6 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तर भारतीय संघ 3 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय नेमबाजांचे पदर्शन पाहता भारतीय संघ अधिक पदके जिंकण्याची अपेक्षा आहे.






