मुंबई इंडियन्सला सोमवारी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडिअन्सच्या संघाने आयपीएल 2024 च्या या सीझनमध्ये सलग तिसरा पराभव त्यांच्या खात्यात जमा केला आहे. आयपीएल 2024 च्या 14 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 गडी गमावून 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. चालू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला आतापर्यंत आपले विजयाचे खाते उघडता आलेले नाही. मुंबईला या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या संघाच्या चुका उघड केल्या. हार्दिक पांड्याने स्वतःला सामन्याचा दोषी घोषित केले आणि सामन्यात राजस्थान रॉयल्सला कसे प्रोत्साहन दिले ते सांगितले.
काय म्हणाला हार्दिक पांड्या
“आम्हाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. तो एक कठीण सामना होता. मला वाटते की आम्ही 150 किंवा 160 धावा करण्याच्या स्थितीत होतो, परंतु मला वाटते की माझ्या विकेटने सामना बदलला आणि विरोधी संघ वरचढ झाला. मला वाटते की मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो.”
पुढे तो म्हणाला “खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली होती, ही चांगली गोष्ट आहे. हा खेळ गोलंदाजांसाठी अक्राळविक्राळ आहे. पण हे अपेक्षित नव्हते. योग्य काम करण्याबाबत ही सगळी चर्चा होती. कधी निकाल अनुकूल असेल तर कधी नाही. अशा गोष्टींनी मला फारसे आश्चर्य वाटत नाही. परंतु एक गट म्हणून आमचा विश्वास आहे की पुढे जाण्यासाठी आणखी चांगल्या गोष्टी आहेत आणि आम्हाला फक्त अधिक शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. आपल्याला अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल.”