राहुल द्रविड आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rahul Dravid’s big statement about Rohit Sharma : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक केले आहे. राहुल म्हणाला की, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ आपली फलंदाजीची शैली बदलली नाही तर जगाला टी-२० क्रिकेट कसे खेळावे याबद्दल देखील एक नवीन दृष्टिकोन दाखवून दिला.
राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या जोडीने भारताला दोन मोठ्या स्पर्धांमध्ये भरभरून यश मिळवून दिले आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. तोपर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला होता, तर त्यानंतर भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद देखील आपल्या नावे केले. हे दोन्ही विजय भारतीय क्रिकेटचे सुवर्ण अध्याय मानले जातात. द्रविडने असा विश्वास व्यक्त केला आहे कि, रोहित शर्माची विचारसरणी आणि आक्रमक खेळण्याची रणनीती या यशासाठी महत्त्वाची ठरली होती.
राहुल द्रविड पुढे म्हणाला की, जेव्हा त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारले तेव्हा त्याने रोहित शर्माशी दीर्घ चर्चा केली होती. दोघांनीही यावर सहमती दर्शवली की भारताने आक्रमक आणि निर्भय क्रिकेट खेळायला हवे. राहुल म्हणाला की, “सुरुवातीपासूनच आम्ही संघाला एका नवीन दिशेने नेण्याचा निर्णय देखील घेतला. रोहितकडून मैदानावर ही विचारसरणी राबवली आणि खेळाडूंना मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. या श्रेयासाठी तो पात्र आहे.” द्रविडने असे देखील म्हटले आहे की, रोहितच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आणि फलंदाजांना अडचणींपासून मुक्तता देखील मिळाली.
राहुल द्रविड पुढे म्हणाला की टी-२० क्रिकेट आता बदलण्याची गरज आहे, कारण भारतीय संघाने ते एका नवीन पातळीवर नेऊन पोहचवले आहे. राहुल द्रविडच्या मते, “आज भारतीय फलंदाजीची पातळी जगात उच्च आहे. त्याचा स्ट्राइक रेट सुमारे ३०० पर्यंत पोहोचलेला आहे. आता इतर संघांना भारताची बरोबरी करावी लागणार आहे. येत्या ३-४ वर्षांत सर्वांनाच आपल्या खेळातून शिकावे लागनर आहे.” द्रविड असा विश्वास करतो की भारताची फलंदाजी आणि रणनीती आता जागतिक क्रिकेटसाठी मानक बनून पुढे आली आहे.
रोहित शर्माची टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय आकडेवारी आहे. त्याने भारतासाठी १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४,२३१ धावा फटकावल्या आहेत. ज्यात पाच शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याने २७२ सामन्यांमध्ये ७,०४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे.






