सूर्यकुमार यादवची पोस्ट व्हायरल (फोटो- सोशल मीडिया)
कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर आणि आगामी मालिकांमधून वगळल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्याच्या नावाने एक खोटे वक्तव्य व्हायरल होत होते. अखेर या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादवने एक्स आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपले अधिकृत विधान शेयर केले आहे. भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार आणि भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू सूर्यकुमार यादव चांगलाच चर्चेत आला आहे.
गेले काही दिवस सूर्यकुमार यादवने भारतीय संघाच्या टी 20 फॉर्मटमध्ये कर्णधारपदावरुन हटवले म्हणून नाराज असल्याचा दावा केला जात होता. अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत होती. मात्र आता सूर्यकुमार यादवने या अफवा फेतलाऊन लावल्या आहेत. सूर्यकुमार यादवने पोस्ट केलेल्या संदेशात आपली अधिकृत प्रतिक्रिया शेयर केली आहे. तसेच त्याने वैभव सूर्यवंशीवर देखील भाष्य केले आहे. सूर्यकुमार यादवची पोस्ट काय आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
साफ रया उतरली! ‘अरे चांगलं तर चाललंय…’; भारताचा पराभव अन् Suryakumar Yadav चा ‘तो’ टोमणा व्हायरल
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
माझ्या नावाने सोशल मिडियावर एक विधान चुकीच्या पद्धतीने फिरवले जात आहे. मात्र मी असे कोणतेही विधान केलेले नाही. अशा स्वरूपाच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच ती पुढे शेयर करू नका. मी नाराज नाही. भारतीय क्रिकेट आणि माझे सहकारी व या खेळाच्याप्रती मला पूर्ण आदर आहे. मला भारतीय संघांसाठी खूप आनंद झाला आहे. मी त्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व खेळाडू मैदानावर 100 टक्के मेहनत करत आहेत. त्यांना माझा नहेमी पूर्ण पाठिंबा असेल.
आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम
टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून भारताला टी 20 सामना जिंकता आलेला नाही. जेव्हा भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज सुरू होण्याच्या आधी भारतीय संघाची आयसीसी टी 20 रॅंकिंग 272 इतकी होती. तर इंग्लंडची रॅंकिंग 262 इतकी आहे. मात्र आता भारताचा परभव होत असल्याने भारताचे रॅंकिनह 1 पॉइंटने कमी झाले आहे. भारताचे पॉईंट्स आटा 271 झाले आहेत. तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरुण 264 इतके झाले आहे. दोन्ही संघांमध्ये असणारा 10 पॉईंट्सचा फरक आटा 7 पॉईंट्सवर आला आहे.






