मुंबई विरुद्ध राजस्थान सामना रद्द होण्याची शक्यता (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई राजस्थान सामना रद्द होण्याची शक्यता
आज गुवाहाटीत पावसाची शक्यता नाही
मात्र वादळी वाऱ्यांमुळे रद्द होण्याचा अंदाज
Tata IPL MI vs RR Weather Updates: आज संध्याकाळी गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. कारण त्यांच्यासमोर फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थानचे आव्हान (MI vs RR)असणार आहे. मात्र आजच्या मॅचवर निसर्गाचे एक आव्हान येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजच्या सामन्यावर पावसाचे संकट नसल्याचे समोर येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज गुवाहाटीत पावसाचा अंदाज नाही. मात्र तरी देखील आजचा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण तेथील वातावरण ढगाळ असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस तिथे होऊ शकतो असे म्हंटले जात आहे.
हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा वादळी वारे असे काही झाल्यास सामना रद्द होणार की थोडा वेळ थांबवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे. त्यामुळे आजचा सामना देखील रद्द होतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
नुसता जाळ अन् धूर निघणार! RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार? कोण ठरणार किंग?
गुवाहाटीमध्ये यलो अलर्ट देण्यात आळीकहे समोर येत आहे. वादळी वाऱ्यासाह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा सामना होणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. सामना सुरू झाला आणि पाऊस आला तर नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार, की रद्द होणार अशी चर्चा आता क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.
RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार?
15 वर्षीय वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही सामन्यांमध्ये वैभवने चांगली खेळी केली आहे. तर मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह नावाचे वादळ आहे. क्रिकेट विश्वातील प्रमुख गोलंदाजांच्या यादीत बुमराहचा समावेश होतो. आज वाईबाहव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराहमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.
MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?
मुंबई विरुद्ध राजस्थान पीच रिपोर्ट
बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.






