भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेत असलेला युवा फलंदाज, वैभव सूर्यवंशी, केवळ त्याच्या फलंदाजीमुळेच नव्हे, तर त्याच्या शिक्षणामुळेही चर्चेत राहिला आहे. या १५ वर्षीय खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावरून क्रिकेट जगतात मतभेद निर्माण झाले होते. अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला भारतीय संघात लवकरात लवकर स्थान देण्याची मागणी केली, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डॅरिल कलिननने अशा घाईला विरोध केला.
कलिनन यांनी अलीकडेच म्हटले आहे की, वैभवची प्रतिभा विलक्षण आहे, परंतु इतक्या लहान वयात त्याच्यावर दबाव टाकणे त्याच्या भविष्यासाठी हानिकारक ठरेल. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे हे वक्तव्य टीका नसून, एका तरुण खेळाडूच्या भविष्याबद्दलची चिंता होती. ते पुढे म्हणाले की, माझ्या ते, वैभवने त्यावेळी घरीच राहून परीक्षेचा अभ्यास करायला हवा होता, मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळायला हवे होते आणि शक्य तितके सामान्य बालपण जगायला हवे होते. ते म्हणाले की, याचा अर्थ प्रतिभा दडपणे असा नाही, तर खेळाडूला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला विकसित होण्यासाठी वेळ देणे असा आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या दहावीच्या बोर्ड परीक्षा दिल्या नाहीत.त्याने सीबीएसई बोर्ड परीक्षा दिल्या नसल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या, मात्र नंतर त्याने त्या परीक्षा दिल्याच नव्हत्या हे उघड झाले.सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारीला सुरू झाल्या, पण वैभव परीक्षा केंद्रावर गेला नाही.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना वैभवचे वडील, संजीव सूर्यवंशी यांनी वैभवने यावर्षी परीक्षा दिली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्यांचा मुलगा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असून पुढच्या वर्षी बोर्ड परीक्षा देईल.ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलचे संचालक आदर्श कुमार पिंटू यांनी असेही सांगितले की, वैभवचा परीक्षेचा अर्ज भरण्यात आला होता आणि त्याचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले होते. सीबीएसईने शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र उभारले होते, परंतु तो परीक्षेला उपस्थित राहिला नाही.त्या वेळी वैभवने अभ्यासापेक्षा क्रिकेटला प्राधान्य दिले होते. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते आणि मोठ्या स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यावर त्याचे लक्ष केंद्रित होते. त्याच्या कुटुंबीयांनीही हे स्पष्ट केले होते की तो पुढच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षा देईल.
वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावरून चर्चा वाढत आहे . अनेक माजी क्रिकेटपटूंना वाटते की, त्याला अधिक काळ थांबवल्यास त्याच्यावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. त्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
इंग्लंडची धक्कादायक रणनीती; विजयासाठी व्हायग्रा वापरण्याची परवानगी? WADA चे नियम काय?






