अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील स्वामी नगर परिसरातील शास्त्रीनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे.
मुंबईकरांवर सध्या पाणीकपातीचं सावट येताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील जलशद्धीकरणासाठी केंद्रातील 100 किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली.
दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व विभागात मुसळधार पाऊस सुरू झाला असून, भात लागण व पेरणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. पावसाने यात व्यत्यय येत असला तरीही शेतकरी पेरणीची घाई करत आहेत.
सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे.
पावसाळा सुरु होण्याआधी शहरातील पाण्याच्या साठ्यांचं निर्जंतूकिरण करणं महत्त्वाचं आहे हीच बाब लक्षात घेत पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी पालिकेने कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, करण्यासाठी बुधवारी शहरात पाणी कपात होणार आहे.
टेमघर धरणातील गळती रोखण्यासाठी जून 2020 पर्यंत अत्यावश्यक कामे करण्यासाठी राज्य सरकारने 323 कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी मान्यता दिली होती. मात्र, भूसंपादन व धरणाची अन्य कामेही करणे आवश्यक असल्याने खर्च…
जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.
जर तुम्ही ठाणे शहरात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.
मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर…
केंद्र शासन रँडम पद्धतीने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करीत असते. तर राज्य शासन पाण्याच्या प्रत्येक स्त्रोतातील पाणी नमुने तपासते, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
महापालिकेने १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार खडकवासला धरणाच्या पायथ्याशी १०० एमएलडीचे प्रत्येकी दोन जलशुद्धीकरण केंद्र, पंपहाऊस व जॅकवेल बांधण्यात येणार आहेत.
बेकायदा नळजोडांमुळे नुकतेच सुरू झालेली पाणी पुरवठा यंत्रणा कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला आहे.
भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. नाम फाउंडेशनच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय जलसंसाधन मंत्री चंद्रकात आर. पाटील यांचे प्रतिपादन
वाढत्या नागरिकीकरणामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी अलिबाग नगरपरिषदेमार्फत पाण्यासाठी 66 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.