बेपत्ता व शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली लागले असून ६८० बचत गटांना ३३ कोटींचा आर्थिक आधार मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार..
धाराशिव जिल्ह्याला प्रथम, सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हृदय आणि मेंदू यांचे आरोग्य एकमेकांशी अतूटपणे जोडलेले असतानाही आपल्या देशात या महत्त्वाच्या नात्याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वारजे महामार्ग चौक ते मुठा नदी असा १२ मीटर डीपी सर्विस रस्ता विकसित करण्यात यावा, यासाठी स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.
वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या सिटी लिंक बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ जास्त अपघात सिटी लिंक बसमुळे झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे.
सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा गट पर्यटनासाठी चेन्नईला गेला होता. आनंदाने सुरू झालेली ही पिकनिक ट्रिप या अपघातामुळे अत्यंत दुःखात परिवर्तीत झाली आहे.
नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित सदस्य अस्वच्छतेच्या प्रश्नांवर चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर करून, निकृष्ट कामे करून शासनाचा निधी अपहार केला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या असताना आता सर्वच ग्रामपंचायतची मुदत दोन तीन दिवसात संपणार आहे. स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता.
काही प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी २०२५-२६ हंगामात देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच फिल्डींग लावण्यास सुरूवात केली असून, त्यातही आघाडीवर नाव असलेल्या माधुरी बोलकर व मच्छिंद्र सानप यांनी स्वतंत्रपणे भेट घेण्याचे ठरविले आहे.
उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ऋतूचक्राचा लपंडाव पाहायला मिळत आहे. पहाटे अंगाला झोंबणारा गारवा आणि दुपारी घामाच्या धारा काढणारे ऊन, अशा विचित्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.