India Pakistan Dispute : चीनमध्ये पोहोचताच शाहबाज शरीफने खेळले 'काश्मीर' कार्ड; भारताने दोन्ही देशांना सुनावले खडे बोल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज सध्या २३ ते २६ दरम्यान चीनच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काश्मीर आणि द्विपक्षीय मुद्द्यावरुन भारताला घेरले होते. चीन आणि पाकिस्तानने मिळून एक संयुक्त निवेदन जारी केले होते. या निवेदनात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीची माहिती दिली. त्यांनी म्हटले की काश्मीर एक ऐतिहासिक विवाद असून सयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान करारांतून सोडवला जावा. दोन्ही देशांनी सीमेपलीकडे पाणी वाटपावरही सहकार्य करण्याची या निवेदनात इच्छा व्यक्त करण्यात आली होती. याला चीनने देखील पाठिंबा दिला आहे.
दरम्यान चीन (China) आणि पाकिस्तानच्या निवेदनावर भारताने कडक भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी दोन्ही देशांना झापलं आहे. सोशल मीडियावर यासंर्दभारत एक पोस्ट करण्यात आली आहे.
रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमी राहतील. या भागांबाबात चीन आणि पाकिस्तानने केलेल वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आहे. तसेच हा भारत-पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही हेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
भारताने केवळ काश्मीर मुद्द्यावरुनच नव्हे, तर चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पावरही आक्षेप घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा घेतला असून या ठिकाणी उभारला जाणार प्रकल्प भारताच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करणारा आहे.
१९६३ मधील चीन-पाकिस्तान (Pakistan) सीमा करारालाही भारताने मान्यता दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पाणी वाटप सहकार्यावरुन, ज्या देशांची थेट सीमाही नद्यांना लागत नाही, तिथे अशा देशांच्या सहकार्याचा प्रश्नच येत नाही असा टोमणा मारला आहे.
Our response to media queries regarding unwarranted references to Indian Union Territory of Jammu & Kashmir in the Joint Statement between China and Pakistan ⬇️ 🔗 https://t.co/HfkNLnQU9L pic.twitter.com/RLJfT5E1Tx — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 26, 2026
Ans: पाकिस्तानचे पंतप्रधान २३ मे २६ मे चीनच्या दौऱ्यावर होते. याभेटीनंतर चीन आणि पाकिस्तानने संयुक्त निवेदन जारी केले. त्यांनी काश्मीर वाद जुना असून यावर संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने आणि भारता-पाकिस्तान द्विपक्षीय कारारांनुसार सोडवण्यात यावा असे म्हटले.
Ans: भारताच्या परराष्ट्र मंंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दोन्ही देशांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमी राहतील. या भागांबाबात चीन आणि पाकिस्तानने केलेल वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आहे. हा भारत-पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही हेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.






