'आम्ही सांगितल्यावरच...', होर्मुझमध्ये जहाजावर गोळीबार केल्यानंतर भारताने नवीन सूचना जारी केली आहे, त्यात काय म्हटले आहे ते जाणून घ्या? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Indian Navy Larak Island advisory 2026: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये १८ एप्रिल रोजी भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबारानंतर आता केंद्र सरकार आणि भारतीय नौदल (Indian Navy) कमालीचे सतर्क झाले आहे. आपल्या खलाशांच्या आणि कोट्यवधींच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने पर्शियन आखातात आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत ७ बलाढ्य युद्धनौका तैनात केल्या आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा फटका भारतीय व्यापाराला बसू नये, यासाठी आता नवी दिल्लीतून थेट सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
भारतीय नौदलाने पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय ध्वज असलेल्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही जहाजाने लारक (Larak Island) बेटाच्या जवळून प्रवास करू नये. या बेटाच्या सभोवतालचा भाग इराणच्या ऊर्जा आणि लष्करी पायाभूत सुविधांसाठी अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे तेथे धोका अधिक आहे. नौदलाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत आमचे अधिकारी हिरवा कंदील दाखवत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही जहाजाने सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Naval War: चर्चेआधीच रणशिंग फुंकलं! USने इराणचे ‘Tuska Ship’ गोळीबार करून केले जप्त; ट्रम्प म्हटले, ‘धडा तर शिकवणारच’
लारक बेट हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्वात अरुंद आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी वसलेले आहे. इराणने येथे बंकर्स, रडार यंत्रणा आणि वेगवान हल्लेखोर बोटींचे जाळे विणले आहे. जागतिक तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी २० टक्के वाहतूक याच मार्गावरून होते, त्यामुळे इराण या भागावर आपला पूर्ण ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘जग अर्णव’ आणि ‘सन्मार हेराल्ड’ या जहाजांवर झालेला गोळीबार याच भागातील तणावाचा परिणाम मानला जात आहे.
India’s reaction stems from confirmed reports: IRGC Navy gunboats fired on the Indian-flagged VLCC Sanmar Herald (carrying Iraqi crude) and another vessel in the Strait of Hormuz today, forcing them to turn back after a brief reopening. Crew safe; audio captured the tanker… — Grok (@grok) April 18, 2026
credit – social media and Twitter
गोळीबाराच्या त्या भयावह दिवशी ‘देश गरिमा’ हे भारतीय टँकर सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. सध्या हे टँकर भारतीय नौदलाच्या सुरक्षा कवचाखाली अरबी समुद्रातून मुंबईच्या दिशेने येत असून २२ एप्रिल रोजी ते मुंबई बंदरात दाखल होईल. मात्र, चिंतेची बाब ही आहे की अद्याप १४ भारतीय जहाजे पर्शियन आखातात होर्मुझ ओलांडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय नौदल या सर्व जहाजांच्या कॅप्टन्सशी सतत संपर्कात असून त्यांना ‘रिअल-टाइम’ सूचना दिल्या जात आहेत.
India has deployed Indian Navy warships to escort tankers exiting the Strait of Hormuz and through the Gulf of Oman under Operation Urja Suraksha for energy security. Defence Minister Rajnath Singh confirmed this, and PM Modi has engaged Iran diplomatically on safe passage amid… — Grok (@grok) April 18, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL
भारतीय नौदलाने ७ युद्धनौका तैनात करून जगाला आणि विशेषतः इराणला हा संदेश दिला आहे की, भारतीय जहाजांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आखाती देशांतील या अस्थिरतेमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून नौदलाने या भागातील गस्त वाढवली आहे. खलाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाची ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत ही मोठी तैनात मानली जात आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखीनच संवेदनशील होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नौदलाचा हा पहारा अधिक कडक केला जाणार आहे.
Ans: नौदलाने भारतीय जहाजांना इराणच्या संवेदनशील 'लारक बेटा'पासून (Larak Island) दूर राहण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
Ans: भारतीय नौदलाने भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी पर्शियन आखातात ७ युद्धनौका तैनात केल्या आहेत.
Ans: 'देश गरिमा' हे तेलवाहू टँकर २२ एप्रिल रोजी मुंबई बंदरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे.






