होर्मुझनंतर आता मलाक्कामध्ये तणाव! इंडोनेशियाची 'टोल' लावण्याची मागणी; सिंगापूरच्या विरोधामुळे जागतिक व्यापारात मोठी खळबळ. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Malacca Strait toll tax proposal : जागतिक सागरी व्यापाराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मलाक्का सामुद्रधुनीवरून (Strait of Malacca) सध्या एक मोठे वादळ निर्माण झाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव शांत होत नाही तोच, आता आग्नेय आशियातील या महत्त्वाच्या मार्गावरून इंडोनेशिया आणि सिंगापूर यांच्यात ठिणगी पडली आहे. इंडोनेशियाने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर टोल कर (Toll Tax) आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे.
इंडोनेशियाचे अर्थमंत्री पुरबाया युधी सदावा यांनी या संदर्भात एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या मते, दररोज हजारो जहाजे इंडोनेशियाच्या सागरी सीमांलगत असलेल्या मलाक्का सामुद्रधुनीतून प्रवास करतात, मात्र त्यातून इंडोनेशियाला कोणताही आर्थिक लाभ होत नाही. त्यामुळे या जहाजांवर टोल आकारून तो महसूल इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तिन्ही देशांत समान विभागला जावा, असा त्यांचा मानस आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनीही याला दुजोरा देताना म्हटले की, पूर्व आशियातील ७०% ऊर्जा व्यापार याच मार्गातून होतो, त्यामुळे यावर कर आकारणे न्याय्य आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Post : महासत्तेचा ‘उलटा’ प्रवास! ट्रम्प यांनी भारताला म्हटले ‘नरक’; ‘ही’ एक पोस्ट आणि संपूर्ण इंटरनेटवर ट्रोलिंगचा स्फोट
इंडोनेशियाच्या या प्रस्तावावर सिंगापूरने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हा सागरी मार्ग कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि कराशिवाय पूर्णपणे ‘मुक्त’ राहिला पाहिजे. सिंगापूरच्या मते, हे तिन्ही देश आधीच एका कराराने बांधले गेले आहेत, ज्यानुसार या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जर अशा प्रकारे टोल लादला गेला, तर सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, कारण त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था सागरी व्यापारावर अवलंबून आहे.
मलाक्का सामुद्रधुनी ही हिंद महासागर आणि प्रशांत महासागराला जोडणारा सर्वात छोटा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील एकूण व्यापाराचा ४० टक्के हिस्सा याच एका अरुंद पट्ट्यातून जातो. तज्ज्ञांच्या मते, जर इंडोनेशियाने हट्ट धरून टोल लागू केला, तर जहाजवाहतुकीचा खर्च (Shipping Cost) मोठ्या प्रमाणात वाढेल. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीवर होईल. आधीच होर्मुझच्या वादामुळे त्रस्त असलेल्या जगाला आता मलाक्कामध्ये नवीन आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची भीती वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Digital War : “Trump Shut Up!” सीझफायरवरून इराणने उडवली अमेरिकेची ‘AI’ थट्टा; VIRAL VIDEOचा जागतिक स्तरावर धडाका
भारताचा बहुतांश व्यापार आणि विशेषतः पूर्वेकडील देशांशी होणारा व्यवहार याच मलाक्का सामुद्रधुनीतून होतो. अंदमान निकोबार बेटांजवळ असलेला हा मार्ग भारतासाठी सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. जर येथे टोल लागू झाला, तर भारतातील आयात-निर्यात महाग होईल, ज्यामुळे देशांतर्गत महागाई वाढू शकते. सध्या सिंगापूर या प्रस्तावाचा विरोध करत असला तरी, इंडोनेशिया आपल्या भूमिकेवर किती ठाम राहतो, यावर जागतिक व्यापाराचे भवितव्य अवलंबून आहे.
Ans: इंडोनेशियाचे अर्थमंत्री पुरबाया युधी सदावा यांनी मलाक्का सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल कर लावण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Ans: सिंगापूरच्या मते, जुन्या करारानुसार हा मार्ग मुक्त असावा आणि टोल लावल्यास जागतिक व्यापार विस्कळीत होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे.
Ans: हा मार्ग हिंद महासागराला प्रशांत महासागराशी जोडतो आणि जगातील सुमारे ४०% व्यापार याच मार्गावरून होतो.






