Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या 'या' निर्णयावर भडकला पाकिस्तान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, भारत लवकरच हिमाचल प्रदेशात लिंक-३ प्रकल्पावर काम सुरु करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत चिनाब नदीचे अतिरिक्त पाणी व्यास नदीत वळवले जाणार आहे. यामुळे भारताला उपबल्ध जलस्त्रोतांचा अधिक वापर करता येईल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यासाठी २६. २ अब्ज रुपयांचे गुंतवणूक करण्यात आली आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भारताचे चिनाब नदीच्या पाण्यावर पूर्ण नियंत्रण राहिल. मात्र, ही बाब पाकिस्तानला अस्वस्थ करत आहे. यामागचे कारण म्हणजे १९६० मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू पाणी वाटप करारानुसार, सिंधू, चिनाब आणि झेलम नदीच्या पश्चिमेकडील पाण्याचा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. यामुळे चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला तर पाकिस्तानच्या शेती आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान पाकिस्तानने भारताच्या या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. चिनाब नदीचे पाणी व्यास नदीकडे वळवणे हे सिंधू पाणी वाटाप कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तसेच आंतराराष्ट्री जल कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकने भारतावर केला आहे.
पाकिस्तानच्या मते, भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांच्या अन्न आणि जल सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. पाकिस्तानी मंत्र्यांनी भारताची ही कृती खपवून घेतली जाणार नाही, आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत असाही इशारा दिला आहे.
परंतु पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) स्थगित करुन स्पष्ट केले होते की, भारताविरोधी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही.
Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त






